शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागात ८१ टक्के पेरणी

By admin | Updated: December 24, 2015 00:30 IST

सातारा आघाडीवर : पाण्याचा ताण; कोल्हापुरात ऊस लागवडीस प्राधान्य

राजाराम लोंढे-कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यांत सरासरी ८१ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वाधिक ९२ टक्के पेरणी ही सातारा जिल्ह्यात झाली आहे. पाण्याखालील पिके जोमात असली तरी हलक्या जमिनीतील पिकांवर पाण्याचा ताण जाणवत आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची सारी मदार ही रब्बी पिकांवर आहे. विशेषत: सांगली व सातारा जिल्ह्यांत त्याचा परिणाम दिसत आहे. सातारा जिल्ह्यात २ लाख १७ हजार ६०० हेक्टर हे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी तब्बल २ लाख १ हजार २५१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झालेली आहे. ज्वारी, गहू, मका, हरभराची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. जिल्ह्यात उसाचे सरासरी ६२ हजार ५४० हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यापैकी २९ हजार २१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. आडसाली पीक वाढीच्या अवस्थेत असून पूर्वहंगामी उसाची उगवण चांगली आहे. रब्बी पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे सुरू असून आडसाली ऊस पिकांवर काही प्रमाणात खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात ज्वारीचे १ लाख ६३ हजार ४७० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८९ हेक्टरवर (८६ टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारी पिके वाढत असून काही ठिकाणी पाण्याचा ताण जाणवत आहे. गहू, हरभरा, मका पिकाची लागवडही चांगली आहे. सरासरी ६४ हजार हेक्टरपैकी १७ हजार ६०१ हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र कमी असते. केवळ १४ हजार ९८ हेक्टरवर (३५ टक्के) पेरणी झालेली आहे. गहू, हरभरा, मक्याची पेरणी कमी आहे. ज्वारीची ७० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झालेली आहे. कृषी विमा योजना खुलीगारपीट, चक्रीवादळ, अपुरा पाऊस, कीडरोग प्रादुर्भाव आदींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदत राष्ट्रीय कृषी विमा योजनेतून मिळते. योजनेत सहभागी होण्यासाठी पेरणीपासून एक महिना अथवा ३१ डिसेंबर यापैकी जी आधी असेल ती, तसेच उन्हाळी भात, भुईमूग पिकासाठी ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे. ऊस पाचटसाठी पुढाकारपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने ऊस पाचट व्यवस्थापन व एक सरीआड पाणी देणे याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन कृषी विभागामार्फत सुरू आहे. त्याचबरोबर ठिबक, तुषार सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी विभागीय पातळीवर मोहीम उघडण्यात आली आहे.