शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यातील ३९ फरारी आरोपी सापडेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात विविध गुन्ह्यांत १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे ३९ गुन्हेगार गेले काही वर्षे पोलिसांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात विविध गुन्ह्यांत १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे ३९ गुन्हेगार गेले काही वर्षे पोलिसांना गुंगारा देत आहेत. सर्व संशयित आरोपींना न्यायालयाने फरारी घोषित केले. हे गुन्हेगार पोलिसांच्या हाती सापडत नसल्याने त्यांच्याबाबतचा तपास गेले अनेक वर्षांपासून पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ३१ पोलीस ठाणी आहेत. राजारामपुरी, गांधीनगर, चंदगड या तीन पोलीस ठाण्यांत सर्वाधिक एकूण २० संशयित अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शिवाय करवीर, गोकुळ शिरगाव, इचलकरंजीतील शिवाजीनगर व शहापूर तसेच शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, हुपरी याही पोलीस ठाण्यांतील संशयित आरोपी न्यायालयाने फरार घोषित केले. अनेक आरोपींनी जामीन मिळाल्यानंतर ते जिल्हा सोडून बाहेरच निघून गेले आहेत. संघटित गुन्हेगारीसह खून, लूटमार, चोरी, मटका प्रकरणात संशयित आरोपी फरार आहेत. संशयित आरोपींना शोधणे पोलिसांना कठीण जात आहे. अनेक फरारी आरोपींनी परराज्यात आसरा घेतल्याचेही बोलले जाते.

पोलीस ठाणे : फरार आरोपी

- राजारामपुरी : ०५

- करवीर : ०२

- गांधीनगर : ०९

- चंदगड : ०६

- शिवाजीनगर (इचलकरंजी) : ०२

- शहापूर (इचलकरंजी) : ०२

- शाहूवाडी, गोकुळ शिरगाव, गगनबावडा, आजरा, हुपरी पोलीस ठाणे येथे प्रत्येकी ०१

- इतर पोलीस ठाणे : १२

पाच वर्षे फरार...

- महाराष्ट्रभर खळबळ उडालेल्या ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सहभागी संशयित विनय पवार व सारंग अकोलकर हे दोघे पोलिसांना सापडत नसल्याने न्यायालयाने त्यांना फरारी घोषित केले. त्यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात पाच वर्षांपूर्वीच गुन्हा नोंद आहे.

- यादवनगरात मटका व्यावसायिक सलीम मुल्ला व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर केलल्या हल्लाप्रकरणी तपासात महाराष्ट्रभर मटका रॅकेट उघडकीस आले. त्याप्रकरणी कोल्हापुरातील सम्राट कोराणे व मुंबईतील प्रकाश ऊर्फ पप्पू सावला या दोघांवर ठपका ठेवला. त्यां दोघांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली. दोघेही सापडत नसल्याने न्यायालयाने त्यांना फरारी घोषित केले. त्यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

- इचलकरंजीतील संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कारवाई झालेले संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे हे दोघे बंधूही गेले अडीच वर्षे फरारी आहेत. त्यांचाही पोलिसांना ठावठिकाणा मिळेना.

मृत्यूनंतरही तपास...

गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याचे मृत्यू प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत पोलिसांचा तपास सुरूच राहतो. संबधित आरोपीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तो मरण पावल्याचे सिध्द होऊन तपास थांबला जातो. त्यामुळे अनेक प्रकरणांत आरोपींच्या मृत्यूनंतरही तपास सुरूच ठेवला जातो.

कोट...

फरार आरोपींचा पोलीस यंत्रणेकडून कसोशीने शोध सुरू आहे. वर्षभरात सहा फरार आरोपींना शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.