शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘एसईबीसी’ प्रवर्गातून नियुक्त ३०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST

कोल्हापूर : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) अंतर्गत २०१८ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याच्या ...

कोल्हापूर : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) अंतर्गत २०१८ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीची याचिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे या प्रवर्गातून नियुक्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये ‘एसईबीसी’मधून राज्य शासनाच्या पोलीस, महसूल, आदी विविध विभागांमध्ये सुमारे ३०० विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली आहे. याबाबत आता ‘एमपीएससी’ने दाखल केलेल्या याचिकेवर मराठा समाजातील संघटना आणि विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या नियुक्त्या कायम राहतील, यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थी आणि संघटनांनी केली आहे.

प्रतिक्रिया

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची अशी अचानकपणे नियुक्ती रद्द करणे योग्य नाही. त्यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा. या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून नियुक्ती देण्याच्या पर्यायाचा सरकारला विचार करता येईल.

- जॉर्ज क्रूझ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

प्रतिक्रिया

एमपीएससीने दाखल केलेली याचिका पाहता, राज्यात नेमके सरकार, शासन जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी चालवितात का? शासनातील अधिकारी असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा समाजासाठी ज्या-ज्या सवलती शासनाला द्यायच्या आहेत, त्यामध्ये भेदभाव न करता त्या तातडीने द्याव्यात.

- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

प्रतिक्रिया

एमपीएसीचा सर्वप्रथम निषेध करतो. विद्यार्थी अहोरात्र परिश्रम करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगतात, ते साकारतात. त्यांच्याबाबत एमपीएससीने चुकीच्या पद्धतीने याचिका दाखल केली आहे. या संबंधित प्रकारांमध्ये जे अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी. एसईबीसीमधील नियुक्त्या कायम राहाव्यात.

ऋतुराज माने, निमंत्रक, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती

प्रतिक्रिया

कोल्हापुरात गेल्या तीन वर्षांमध्ये साधारणत: ३०० विद्यार्थ्यांची एसईबीसीमधून नियुक्ती झाली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या याचिकेमुळे या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. आयोगावर कारवाई करावी.

- वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ