शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

"अडथळ्यांची शर्यत तयार करून विकास कामाची गती मोजायची," मुख्यमंत्र्यांनी केले भाजपला लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 18:58 IST

Uddhav Thackeray : एकीकडे तगडय़ात तंगडे अडकवून अडथळ्य़ाची शर्यत निर्माण करायची आणि दुसरीकडे विकास कामांची गती मोजायची असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

कल्याण - एकीकडे तगडय़ात तंगडे अडकवून अडथळ्य़ाची शर्यत निर्माण करायची आणि दुसरीकडे विकास कामांची गती मोजायची असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. केंद्राकडे राज्याचे अनेक प्रकल्प रखडलेले आहे. त्यात अडथळे निर्माण करुन राज्यातील विकास कामे होत नसल्याची टिका भाजप करीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा टोला भाजलपा लगावला आहे. कल्याणमधील बहुचर्चित नव्या पत्री पूलाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्स जनतेसी संवाद साधला.या प्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप खासदार कपील पाटील,शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील, राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक राधेश्याम मोपलवार, माजी महापौर विनिता राणो, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. मागच्या सरकारच्या काळात कामे होत होती असे बोलून आताचे सरकार काय करीत आहे असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात असला तरी मागचे सरकार हे बोलाचाच भात आणि बोलाची कढी होते. पत्री पूलाचे काम पूर्णत्वास आल्याने महाविकास आघाडी सरकारने करुन दाखविले आहे.विकास कामावरुन शिवसेना भाजपमध्ये टक्के टोमणे आणि टीकाबाजीकल्याण-पत्री पूलाच्या कार्यक्रमात खासदार कपील पाटील यांनी पत्री पूलाचे काम पूर्णत्वास आले असले तरी भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्याचबरोबर ठाणो-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ठाणो ते भिवंडी दरम्यान प्रगती पथावर आहे. मात्र भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रो रेल्वेच्या कामाची निविदाच निघाली नाही. हे मुद्दे उपस्थित केले. पालकमंत्री या नात्याने या लक्ष्य घालणाची मागणी पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्राचा ५० टक्के निधी व राज्य आणि महापालिकेचा निधी मिळून हे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे या प्रकल्पात केंद्र सरकारचे अर्थात भाजपचे योगदान असल्याचा मुद्दा उपस्थित केला. निवडणूका आल्यावर वाटप सुरु करु नका असा टोला शिवसेनला लगावला. मात्र या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाटील यांच्या वक्तव्याला उत्तर देताना यापूर्वी ६ हजार ५०० कोटीचा निधी देण्याचे सांगण्यात आले. निवडणूकीत वचन देणारे वचन देऊन निघून गेले. त्यामुळे निवडणूकीपूरते गाजर वाटप न करता चांगली कामे करा असा सल्ला भाजपला दिला. तसेच पाटील यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेत आम्ही चांगली कामे केली आहेत. ती जनतेसमोर आहेत असे वक्तव्य केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाkalyanकल्याण