शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

अर्धा एकर जमिनीसाठी चुलत भावाचा खून, आरोपीला पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 09:25 IST

झारखंडमधून एकाला केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : गावातील २० गुंठे जमिनीच्या वादातून दोघा भावांनी चुलत भावाची दगडाने प्रहार करून, खून केल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. पुरण सिकंदर महतो (वय ४७) असे मृत भावाचे नाव आहे, तर खून करणाऱ्या दोघांपैकी कालुकुमार सीताराम महतो याला झारखंड येथून अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, त्याचा भाऊ लालुकुमार सीताराम महतो हा फरार आहे. 

कालुकुमारला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला  स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले, हल्लाही झाला, परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता पोलीस आरोपीला ताब्यात घेत डोंबिवलीत घेऊन आले. मूळचे झारखंड येथील रहिवासी असलेले पुरण हे मजुरीचे काम करण्यासाठी डोंबिवलीतील गोळवली गावात वास्तव्याला होते, तर त्यांचे चुलत भाऊ कालुकुमार आणि लालुकुमार हे दोघेही गोळवलीत इतर ठिकाणी राहात होते. पुरणचा त्याच्या चुलत भावांशी जमिनीवरून वाद होता. या वादातून झारखंडमध्ये त्यांच्यावर परस्परविरोधी गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, पुरणचा काटा काढून हा वाद कायमचा संपवायचा असा डाव भावांनी आखला. 

कालुकुमार आणि लालुकुमार यांनी ४ नोव्हेंबरला रात्री पुरणला घरी जेवायला बोलावले. त्याला दारू पाजली. यावेळी जमिनीचा विषय उकरून काढत भांडण केले आणि मारहाण केली. डोक्यात दगड घातल्याने पुरण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर हल्ला करून दोघेही पळून गेले. बेशुद्ध अवस्थेत पुरण हा आढळला. याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी पुरणला सायन रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पुरणचा ८ नोव्हेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला.

सोमवारपर्यंत सुनावली पोलीस कोठडीगोळवलीत पोलिसांनी चौकशी केली असता, त्याच्या चुलत भावांची आणि जमिनीच्या वादाची माहिती मिळाली, तसेच ते झारखंड येथील मूळ गावी गेल्याची माहिती मिळताच, डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक झारखंडला रवाना झाले आणि त्यांनी कालुकुमारला बेड्या ठोकल्या. त्याला सोमवार, २२  नोव्हेंबरपर्यंत कल्याण सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस