शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीत 36 दिवसांत आढळले तब्बल 22 हजार 168 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:57 IST

कल्याण पश्चिमेसह डोंबिवली पूर्व हॉटस्पॉट : रुग्ण दुपटीचा कालावधी ४३ दिवसांवर

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाने कहर केला असून, १ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत आढळलेल्या रुग्णांचा आढावा घेता गेल्या ३६ दिवसांत तब्बल २२ हजार १६८ रुग्ण आढळले आहेत. तसेच ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत कल्याण पश्चिममध्ये सात हजार ८७६ तर डोंबिवली पूर्वमध्ये सात हजार ७७४ रुग्ण आढळल्याने हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.मनपाच्या हद्दीत कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढत असून दररोज आढळणारी रुग्णसंख्या आजमितीला तेराशे ते सतराशेच्या दरम्यान आहे. मंगळवारी एक हजार ३०९ रुग्णांची भर पडल्याने आजवरची कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८६ हजार ८०६ पर्यंत पोहोचली आहे. यातील ७४ हजार १८२ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २७५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्वेत रुग्णांचा वाढता आलेख चिंताजनक आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या दोन विभागांमध्ये दररोज ४८ ते ५८ च्या आसपास आढळणारी रुग्णांची संख्या आजमितीला ५०० ते ६०० च्या वर गेली आहे. ४ एप्रिलला डोंबिवली पूर्वेत ५१० तर कल्याण पश्चिमेत ६५० रुग्ण आढळले आहेत. गेल्या ३६ दिवसांतील रुग्णांची आकडेवारी पाहता डोंबिवली पूर्वेत सात हजार ७७४ तर कल्याण पश्चिमेत सात हजार ८७६ इतकी आहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेतील परिस्थिती फारशी आलबेल आहे, असे नाही. त्या ठिकाणीही तीन हजार ३० डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेत तीन हजार ५४४ जणांना बाधा झाली आहे. यापाठोपाठ मांडा-टिटवाळा भागात एक हजार ६९, मोहना परिसरात ३४० तर पिसवलीत २४ रुग्ण आढळून आले आहेत. मनपा हद्दीतील रुग्णसंख्येत दिवसागणिक भरमसाट वाढ होत असल्याने रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील झाले असून, आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.महापालिका हद्दीत मृत्यूदर १.६७ , बरे हाेण्याचे प्रमाण ८६ टक्केकोरोनाच्या पहिल्या लाटेत १२ जुलैला सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. त्या वेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९ ते १० दिवसांवर आला होता. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात हा कालावधी २१० ते २६० दिवसांवर गेला होता. परंतु, सद्य:स्थितीला रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी आता पुन्हा ४३ दिवसांवर आला आहे. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पाहता सद्य:स्थितीला मनपाच्या हद्दीतील मृत्युदर हा १.६७ टक्के इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के इतके आहे.कोरोना चाचण्यांमध्ये वाढएकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मंगळवारी साडेपाच हजारांच्या आसपास नागरिकांची कोरोना चाचणी केल्याची माहिती मनपाच्या साथरोग विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या