शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी ८८ वर्षीय आजींचा २८ वर्षांचा अन्नत्याग! भूमिपूजनाच्या दिवशी व्रत सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 20:22 IST

८८ वर्षीय उर्मिला अद्यापही निमंत्रणाच्या प्रतिक्षेत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून उर्मिला राम मंदिर निर्माणाची वाट पाहत आहेत. तेसुद्धा अन्नाचा त्याग करून.

उत्तर प्रदेशातीलअयोध्यानगरीत लवकरच भव्य श्री राम मंदिर निर्माण होणार आहे. बुधवारी ५ ऑगस्टला  राम जन्म भूमी पूजन होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे या क्षणाची भव्यता काही अंशी कमी वाटत असली तरी उत्साहात कोणतीच कमतरता जाणवत नाही. या ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या नगरीला सजवलं गेलं आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी देशातील अनेक साधु-संतांना, नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

येथील रस्त्यांवर दुतर्फा रोषणाई करण्यात आली आहे, रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत, येथील भिंतीही सजवल्या गेल्या आहेत. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमीपूजन पार पडणार आहे. यानिमित्ताने राममंदिरासाठी अनेक वर्ष तहान भूक विसरलेल्या एका आजींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भूमीपूजन सोहळ्यासाठी २०० लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

जबलपूरमध्ये राहणाऱ्या ८८ वर्षीय उर्मिला अद्यापही निमंत्रणाच्या प्रतिक्षेत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून उर्मिला राम मंदिर निर्माणाची वाट पाहत आहेत. तेसुद्धा अन्नाचा त्याग करून. उर्मिला चतुर्वेदी यांनी गेल्या २८ वर्षांपासून फक्त फलाहार घेतला आहे. राममंदिराच्या प्रतिक्षेत अन्नत्याग करून त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ व्यतीत केला आहे.

आता ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनासोबतच आपलं व्रत तोडण्याचा निर्णय उर्मिला यांनी घेतल्यानं त्यांच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. १९९२ साली कारसेवकांनी वादग्रस्त बांधकाम पाडल्यानंतर  मोठा संघर्ष घडला होता. तेव्हा उर्मिला चतुर्वेदी यांना प्रचंड दुःख झाल्यानं त्यांनी अन्नग्रहण करणं सोडले. अयोध्येत भूमिपूजन सोहळ्यासाठी 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'कडून अनेक खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येतंय. पण उर्मिला चतुर्वेदी यांना आमंत्रण मिळालेलं नाही. अशा स्थितीत उर्मिला कुटुंबियांकडे भूमिपूजनाला जाण्यासाठी हट्ट करत आहेत. परंतू लॉकडाऊनमुळे हे शक्य नसल्यानं त्यांना भूमिपूजनास येणं कठिण झालं आहे.

उर्मिला यांच्या कुटुंबियांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार उर्मिला यांनी लवकर अन्न ग्रहण सुरू करावं, असं त्यांचं म्हणणं आहे. २८ वर्षांत त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागले आहे. अन्नत्याग केल्यानं उर्मिला या आपले नातेवाईक आणि समाजापासूनही दूरावल्याचं त्यांचे कुटुंबीयांनी सांगितले.  अजूनही उर्मिला यांनी अयोध्येतच राहून आपलं उर्वरित आयुष्य श्रीरामांच्या सेवेत घालवण्याचा विचार केला आहे.

बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

बोंबला! मजेसाठी 'त्याने' प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले असे काही, सीटी स्कॅन पाहून डॉक्टरही झाले हैराण.....

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्या