शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

भारतातील या समाजात लग्नाआधीच प्रेग्नेंट होतात तरूणी, कुटुंबाचा लग्नासाठीही नसतो काही दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 10:00 IST

Weird Tradition : येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे.

Weird Tradition Around The World: बऱ्याचदा लोक हा विचार करतात की, आदिवासी समाजातील लोकांच्या परंपरा मॉडर्न जगापासून फार वेगळ्या असतात. जास्तीत जास्त लोकांनी ज्या प्रथा आजच्या जगात मागे सोडल्या आहेत, त्या या लोकांनी आजही धरून ठेवल्या आहेत. पण आज आम्ही हा विचार चुकीचा ठरवणाऱ्या एका समाजाबाबत सांगणार आहोत. येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे.

लिव इन रिलेशनशिपबाबत आजही समाजात वाद होतात. पण गरसिया समाजात ही परंपरा 1 हजार वर्षापासून चालत आली आहे. इथे तरूण आणि तरूणी सोबत राहून आधी बाळाला जन्म देतात, नंतर लग्नाबाबत विचार करतात. हा समाज काही आफ्रिका किंवा अॅमेझॉनच्या जंगलात राहत नाही. हे लोक आपल्याच देशात गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये राहतात. 

या समाजातील मुलींना त्यांच्यासाठी मुलगा निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. यासाठी दोन दिवसांची जत्रा भरवली जाते. इथे त्या त्यांच्या आवडीचा मुलगा निवडून त्याच्यासोबत पळून जातात. नंतर परत आल्यावर दोघेही सोबत राहणं सुरू करतात. यात कुटुंबाचीही काही हरकत नसते. उलट मुलाकडील लोक मुलीच्या परिवाराला काही पैसेही देतात. कपलवर लग्नाचा कोणताही दबाव टाकला जात नाही आणि या नात्यातून ते बाळालाही जन्म देऊ शकतात. जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत ते लग्नाबाबत विचारही करत नाही. बाळ जन्माला आल्यावरही हे त्यांच्या हाती असतं की, लग्न करायचं की नाही.

महत्वाची बाब म्हणजे तरूणीवर कोणत्याही एकाच तरूणासोबत जीवन जगण्याचा कोणताच दबाव नसतो. जर त्यांना सोबत रहायचं नसेल तर त्या दुसरा साथीदार निवडू शकतात. इतकंच नाही तर नवा साथीदार जुन्या साथीदारापेक्षा जास्त पैसे देतो. तेव्हा तरूणी त्याच्यासोबत जाऊ शकते. इथेही लग्नाचा कोणताही दबाव नसतो. अनेकांची लग्ने तर वृद्ध झाल्यावर त्यांची मुलं लावून देतात. बरेचजण लग्न न करताच तसेच आयुष्य सोबत घालवतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतकी मॉडर्न प्रथा गरासिया समाजातील लोकांमध्ये आधी कुणी आणली असेल? अशी मान्यता आहे की, या समाजातील 4 भावांपैकी तिघांनी लग्ने केली होती. तर एक भाऊ एका तरूणासोबत असाच राहत होता. यातील तीन भावांना मुलं झाली नाहीत. पण चौथ्या भावाला अपत्य झालं. तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाल्याचं सांगितलं जातं. या प्रथेला ‘दापा प्रथा’ असं म्हणतात. या प्रथेनुसार,  जेव्हाही लग्न होतं तेव्ह सगळा खर्च नवरदेवाच्या कुटुंबाला करावा लागतो आणि लग्नही नवरदेवाच्या घरी होतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेmarriageलग्न