शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भारतातील या समाजात लग्नाआधीच प्रेग्नेंट होतात तरूणी, कुटुंबाचा लग्नासाठीही नसतो काही दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 10:00 IST

Weird Tradition : येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे.

Weird Tradition Around The World: बऱ्याचदा लोक हा विचार करतात की, आदिवासी समाजातील लोकांच्या परंपरा मॉडर्न जगापासून फार वेगळ्या असतात. जास्तीत जास्त लोकांनी ज्या प्रथा आजच्या जगात मागे सोडल्या आहेत, त्या या लोकांनी आजही धरून ठेवल्या आहेत. पण आज आम्ही हा विचार चुकीचा ठरवणाऱ्या एका समाजाबाबत सांगणार आहोत. येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे.

लिव इन रिलेशनशिपबाबत आजही समाजात वाद होतात. पण गरसिया समाजात ही परंपरा 1 हजार वर्षापासून चालत आली आहे. इथे तरूण आणि तरूणी सोबत राहून आधी बाळाला जन्म देतात, नंतर लग्नाबाबत विचार करतात. हा समाज काही आफ्रिका किंवा अॅमेझॉनच्या जंगलात राहत नाही. हे लोक आपल्याच देशात गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये राहतात. 

या समाजातील मुलींना त्यांच्यासाठी मुलगा निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. यासाठी दोन दिवसांची जत्रा भरवली जाते. इथे त्या त्यांच्या आवडीचा मुलगा निवडून त्याच्यासोबत पळून जातात. नंतर परत आल्यावर दोघेही सोबत राहणं सुरू करतात. यात कुटुंबाचीही काही हरकत नसते. उलट मुलाकडील लोक मुलीच्या परिवाराला काही पैसेही देतात. कपलवर लग्नाचा कोणताही दबाव टाकला जात नाही आणि या नात्यातून ते बाळालाही जन्म देऊ शकतात. जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत ते लग्नाबाबत विचारही करत नाही. बाळ जन्माला आल्यावरही हे त्यांच्या हाती असतं की, लग्न करायचं की नाही.

महत्वाची बाब म्हणजे तरूणीवर कोणत्याही एकाच तरूणासोबत जीवन जगण्याचा कोणताच दबाव नसतो. जर त्यांना सोबत रहायचं नसेल तर त्या दुसरा साथीदार निवडू शकतात. इतकंच नाही तर नवा साथीदार जुन्या साथीदारापेक्षा जास्त पैसे देतो. तेव्हा तरूणी त्याच्यासोबत जाऊ शकते. इथेही लग्नाचा कोणताही दबाव नसतो. अनेकांची लग्ने तर वृद्ध झाल्यावर त्यांची मुलं लावून देतात. बरेचजण लग्न न करताच तसेच आयुष्य सोबत घालवतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतकी मॉडर्न प्रथा गरासिया समाजातील लोकांमध्ये आधी कुणी आणली असेल? अशी मान्यता आहे की, या समाजातील 4 भावांपैकी तिघांनी लग्ने केली होती. तर एक भाऊ एका तरूणासोबत असाच राहत होता. यातील तीन भावांना मुलं झाली नाहीत. पण चौथ्या भावाला अपत्य झालं. तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाल्याचं सांगितलं जातं. या प्रथेला ‘दापा प्रथा’ असं म्हणतात. या प्रथेनुसार,  जेव्हाही लग्न होतं तेव्ह सगळा खर्च नवरदेवाच्या कुटुंबाला करावा लागतो आणि लग्नही नवरदेवाच्या घरी होतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेmarriageलग्न