शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भारतातील या समाजात लग्नाआधीच प्रेग्नेंट होतात तरूणी, कुटुंबाचा लग्नासाठीही नसतो काही दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 10:00 IST

Weird Tradition : येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे.

Weird Tradition Around The World: बऱ्याचदा लोक हा विचार करतात की, आदिवासी समाजातील लोकांच्या परंपरा मॉडर्न जगापासून फार वेगळ्या असतात. जास्तीत जास्त लोकांनी ज्या प्रथा आजच्या जगात मागे सोडल्या आहेत, त्या या लोकांनी आजही धरून ठेवल्या आहेत. पण आज आम्ही हा विचार चुकीचा ठरवणाऱ्या एका समाजाबाबत सांगणार आहोत. येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे.

लिव इन रिलेशनशिपबाबत आजही समाजात वाद होतात. पण गरसिया समाजात ही परंपरा 1 हजार वर्षापासून चालत आली आहे. इथे तरूण आणि तरूणी सोबत राहून आधी बाळाला जन्म देतात, नंतर लग्नाबाबत विचार करतात. हा समाज काही आफ्रिका किंवा अॅमेझॉनच्या जंगलात राहत नाही. हे लोक आपल्याच देशात गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये राहतात. 

या समाजातील मुलींना त्यांच्यासाठी मुलगा निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. यासाठी दोन दिवसांची जत्रा भरवली जाते. इथे त्या त्यांच्या आवडीचा मुलगा निवडून त्याच्यासोबत पळून जातात. नंतर परत आल्यावर दोघेही सोबत राहणं सुरू करतात. यात कुटुंबाचीही काही हरकत नसते. उलट मुलाकडील लोक मुलीच्या परिवाराला काही पैसेही देतात. कपलवर लग्नाचा कोणताही दबाव टाकला जात नाही आणि या नात्यातून ते बाळालाही जन्म देऊ शकतात. जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत ते लग्नाबाबत विचारही करत नाही. बाळ जन्माला आल्यावरही हे त्यांच्या हाती असतं की, लग्न करायचं की नाही.

महत्वाची बाब म्हणजे तरूणीवर कोणत्याही एकाच तरूणासोबत जीवन जगण्याचा कोणताच दबाव नसतो. जर त्यांना सोबत रहायचं नसेल तर त्या दुसरा साथीदार निवडू शकतात. इतकंच नाही तर नवा साथीदार जुन्या साथीदारापेक्षा जास्त पैसे देतो. तेव्हा तरूणी त्याच्यासोबत जाऊ शकते. इथेही लग्नाचा कोणताही दबाव नसतो. अनेकांची लग्ने तर वृद्ध झाल्यावर त्यांची मुलं लावून देतात. बरेचजण लग्न न करताच तसेच आयुष्य सोबत घालवतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतकी मॉडर्न प्रथा गरासिया समाजातील लोकांमध्ये आधी कुणी आणली असेल? अशी मान्यता आहे की, या समाजातील 4 भावांपैकी तिघांनी लग्ने केली होती. तर एक भाऊ एका तरूणासोबत असाच राहत होता. यातील तीन भावांना मुलं झाली नाहीत. पण चौथ्या भावाला अपत्य झालं. तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाल्याचं सांगितलं जातं. या प्रथेला ‘दापा प्रथा’ असं म्हणतात. या प्रथेनुसार,  जेव्हाही लग्न होतं तेव्ह सगळा खर्च नवरदेवाच्या कुटुंबाला करावा लागतो आणि लग्नही नवरदेवाच्या घरी होतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेmarriageलग्न