शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

एमबीए, बीएससी झालेले तिघं आता सांभाळताहेत शेती; पहिल्याच हंगामात केली १० लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 18:14 IST

Trending Viral News in Marathi : एमबीए, बीएससी आणि बीकॉम पूर्ण केल्यानंतर, तिन्ही मित्रांनी एकत्रित पारंपारिक शेती पद्धतीऐवजी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊननंतर अनेक सुरक्षित तरूण कमाईचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या गावी आले. कोणी लहानसा बिझनेस टाकला तर कोणी शेतीच्या कामातून उत्पन्न घ्यायला सुरूवात केली. उच्च शिक्षण असतानाही नोकरी न करता शेतीमध्ये मन रमवून उत्पन्न घेत असलेल्या तीन मित्रांची गोष्ट समोर आली आहे. शेती विधेयकाला विरोध सुरू असतानाही महाराजगंज जिल्ह्यातील तीन तरुण मित्र शेतीतील प्रगतीचे एक अनोखं उदाहरण ठरले आहेत. एमबीए, बीएससी आणि बीकॉम पूर्ण केल्यानंतर, तिन्ही मित्रांनी एकत्रित पारंपारिक शेती पद्धतीऐवजी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला.

भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील रहिवासी दुर्गेश सिंग हा एमबीए पदवीधर आहे. दुर्गेश त्याचे दोन मित्र वरुण सिंग आणि आदित्य शाही यांच्यासह गेल्या एका वर्षापासून  पारंपारिक शेतीऐवजी अधुनिक पद्धतीने पाच एकर शेतात फळे आणि भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करीत आहेत. फलोत्पादन विभागाचे तांत्रिक सहाय्य आणि अनुदानावर पुरवणार्‍या कृषी यंत्रणेच्या मदतीने दुधी, काकडी आणि हंगामी भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करण्यास सुरवात केली.

यासाठी शासनाच्या मदतीने शेतीत नवीन तंत्रज्ञान अवलंबले गेले. पहिल्या हंगामात पारंपारिक शेतीच्या तुलनेत उत्पन्न सात पट वाढले. पाच एकर क्षेत्रात फळ आणि भाजीपाल्यांच्या सेंद्रिय शेतीमुळे २ डझनपेक्षा जास्त लोकांना रोजगारा मिळाला आणि दहा लाख रुपयांचा नफा झाला.  आदित्य प्रताप सिंह यांनी सांगितले की, ''गेल्या 6 महिन्यांत भाज्या व फळांचे उत्पादन सुरू झाले. एकूण किंमत दीड लाख रुपयांचा खर्च यासाठी आला. विक्रीतून 12 लाख रुपये मिळाले. यामुळे उत्साह वाढला आणि स्वप्ने पूर्ण करण्याच्या आशा वाढल्या. सध्या या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. 

जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीचे आदर्श म्हणून उदयास आलेल्या आदित्य प्रताप सिंह, दुर्गेश सिंग, वरुण शाही यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीत चांगला वापर केला. त्यांच्या पदवीने देखील यात मदत केली. वरुण शाही (वय 35) हे बी कॉम पास आहेत, आदित्य सिंह विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत, दुर्गेश सिंग यांनी एमबीए केले आहेत.

वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला

या तिघांनीही आपल्या जिद्दीने व मेहनतीने सहा महिन्यांत चांगले परिणाम दाखवले आणि इतर शेतकर्‍यांनाही सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केले. वरुण शाही शेतीचे काम पाहतात, आदित्य सिंह पेरणीपासून काढणीपर्यंत वैज्ञानिक पध्दतीचा उपयोग करतात. एमबीए पदवी धारक दुर्गेश फळे आणि भाज्यांचे विपणन आणि व्यवस्थापन करतात.

अरेरे! आईनं सोडलं, वडील तुरूंगात; ९ वर्षाच्या चिमुरड्यावर आली रस्त्यावर राहण्याची वेळ

या तीघांचे सेंद्रिय शेतीचे काम सुरळीत सुरू असताना पिकांच्या विक्रीवर लॉकडाऊनचा धोका होता. त्याचवेळी त्यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला  बिझनेस कनेक्ट केला आणि त्यांचे फळं, भाज्या ऑनलाइन विक्री करण्यास सुरवात केली. बनारस, जौनपूर, अलाहाबादचे व्यापारी वाजवी दराने विक्रीसाठी उपलब्ध सेंद्रिय पिके पाहून घाऊक खरेदीसाठी पुढे आले. यानंतर, सेंद्रिय पद्धतीने महाराजगंजमधून पिकलेली फळे आणि भाज्या महानगरांपर्यंत पोहोचू लागल्या.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश