शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एमबीए, बीएससी झालेले तिघं आता सांभाळताहेत शेती; पहिल्याच हंगामात केली १० लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 18:14 IST

Trending Viral News in Marathi : एमबीए, बीएससी आणि बीकॉम पूर्ण केल्यानंतर, तिन्ही मित्रांनी एकत्रित पारंपारिक शेती पद्धतीऐवजी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊननंतर अनेक सुरक्षित तरूण कमाईचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या गावी आले. कोणी लहानसा बिझनेस टाकला तर कोणी शेतीच्या कामातून उत्पन्न घ्यायला सुरूवात केली. उच्च शिक्षण असतानाही नोकरी न करता शेतीमध्ये मन रमवून उत्पन्न घेत असलेल्या तीन मित्रांची गोष्ट समोर आली आहे. शेती विधेयकाला विरोध सुरू असतानाही महाराजगंज जिल्ह्यातील तीन तरुण मित्र शेतीतील प्रगतीचे एक अनोखं उदाहरण ठरले आहेत. एमबीए, बीएससी आणि बीकॉम पूर्ण केल्यानंतर, तिन्ही मित्रांनी एकत्रित पारंपारिक शेती पद्धतीऐवजी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला.

भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील रहिवासी दुर्गेश सिंग हा एमबीए पदवीधर आहे. दुर्गेश त्याचे दोन मित्र वरुण सिंग आणि आदित्य शाही यांच्यासह गेल्या एका वर्षापासून  पारंपारिक शेतीऐवजी अधुनिक पद्धतीने पाच एकर शेतात फळे आणि भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करीत आहेत. फलोत्पादन विभागाचे तांत्रिक सहाय्य आणि अनुदानावर पुरवणार्‍या कृषी यंत्रणेच्या मदतीने दुधी, काकडी आणि हंगामी भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करण्यास सुरवात केली.

यासाठी शासनाच्या मदतीने शेतीत नवीन तंत्रज्ञान अवलंबले गेले. पहिल्या हंगामात पारंपारिक शेतीच्या तुलनेत उत्पन्न सात पट वाढले. पाच एकर क्षेत्रात फळ आणि भाजीपाल्यांच्या सेंद्रिय शेतीमुळे २ डझनपेक्षा जास्त लोकांना रोजगारा मिळाला आणि दहा लाख रुपयांचा नफा झाला.  आदित्य प्रताप सिंह यांनी सांगितले की, ''गेल्या 6 महिन्यांत भाज्या व फळांचे उत्पादन सुरू झाले. एकूण किंमत दीड लाख रुपयांचा खर्च यासाठी आला. विक्रीतून 12 लाख रुपये मिळाले. यामुळे उत्साह वाढला आणि स्वप्ने पूर्ण करण्याच्या आशा वाढल्या. सध्या या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. 

जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीचे आदर्श म्हणून उदयास आलेल्या आदित्य प्रताप सिंह, दुर्गेश सिंग, वरुण शाही यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीत चांगला वापर केला. त्यांच्या पदवीने देखील यात मदत केली. वरुण शाही (वय 35) हे बी कॉम पास आहेत, आदित्य सिंह विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत, दुर्गेश सिंग यांनी एमबीए केले आहेत.

वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला

या तिघांनीही आपल्या जिद्दीने व मेहनतीने सहा महिन्यांत चांगले परिणाम दाखवले आणि इतर शेतकर्‍यांनाही सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केले. वरुण शाही शेतीचे काम पाहतात, आदित्य सिंह पेरणीपासून काढणीपर्यंत वैज्ञानिक पध्दतीचा उपयोग करतात. एमबीए पदवी धारक दुर्गेश फळे आणि भाज्यांचे विपणन आणि व्यवस्थापन करतात.

अरेरे! आईनं सोडलं, वडील तुरूंगात; ९ वर्षाच्या चिमुरड्यावर आली रस्त्यावर राहण्याची वेळ

या तीघांचे सेंद्रिय शेतीचे काम सुरळीत सुरू असताना पिकांच्या विक्रीवर लॉकडाऊनचा धोका होता. त्याचवेळी त्यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला  बिझनेस कनेक्ट केला आणि त्यांचे फळं, भाज्या ऑनलाइन विक्री करण्यास सुरवात केली. बनारस, जौनपूर, अलाहाबादचे व्यापारी वाजवी दराने विक्रीसाठी उपलब्ध सेंद्रिय पिके पाहून घाऊक खरेदीसाठी पुढे आले. यानंतर, सेंद्रिय पद्धतीने महाराजगंजमधून पिकलेली फळे आणि भाज्या महानगरांपर्यंत पोहोचू लागल्या.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश