शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एमबीए, बीएससी झालेले तिघं आता सांभाळताहेत शेती; पहिल्याच हंगामात केली १० लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 18:14 IST

Trending Viral News in Marathi : एमबीए, बीएससी आणि बीकॉम पूर्ण केल्यानंतर, तिन्ही मित्रांनी एकत्रित पारंपारिक शेती पद्धतीऐवजी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊननंतर अनेक सुरक्षित तरूण कमाईचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या गावी आले. कोणी लहानसा बिझनेस टाकला तर कोणी शेतीच्या कामातून उत्पन्न घ्यायला सुरूवात केली. उच्च शिक्षण असतानाही नोकरी न करता शेतीमध्ये मन रमवून उत्पन्न घेत असलेल्या तीन मित्रांची गोष्ट समोर आली आहे. शेती विधेयकाला विरोध सुरू असतानाही महाराजगंज जिल्ह्यातील तीन तरुण मित्र शेतीतील प्रगतीचे एक अनोखं उदाहरण ठरले आहेत. एमबीए, बीएससी आणि बीकॉम पूर्ण केल्यानंतर, तिन्ही मित्रांनी एकत्रित पारंपारिक शेती पद्धतीऐवजी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला.

भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील रहिवासी दुर्गेश सिंग हा एमबीए पदवीधर आहे. दुर्गेश त्याचे दोन मित्र वरुण सिंग आणि आदित्य शाही यांच्यासह गेल्या एका वर्षापासून  पारंपारिक शेतीऐवजी अधुनिक पद्धतीने पाच एकर शेतात फळे आणि भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करीत आहेत. फलोत्पादन विभागाचे तांत्रिक सहाय्य आणि अनुदानावर पुरवणार्‍या कृषी यंत्रणेच्या मदतीने दुधी, काकडी आणि हंगामी भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करण्यास सुरवात केली.

यासाठी शासनाच्या मदतीने शेतीत नवीन तंत्रज्ञान अवलंबले गेले. पहिल्या हंगामात पारंपारिक शेतीच्या तुलनेत उत्पन्न सात पट वाढले. पाच एकर क्षेत्रात फळ आणि भाजीपाल्यांच्या सेंद्रिय शेतीमुळे २ डझनपेक्षा जास्त लोकांना रोजगारा मिळाला आणि दहा लाख रुपयांचा नफा झाला.  आदित्य प्रताप सिंह यांनी सांगितले की, ''गेल्या 6 महिन्यांत भाज्या व फळांचे उत्पादन सुरू झाले. एकूण किंमत दीड लाख रुपयांचा खर्च यासाठी आला. विक्रीतून 12 लाख रुपये मिळाले. यामुळे उत्साह वाढला आणि स्वप्ने पूर्ण करण्याच्या आशा वाढल्या. सध्या या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. 

जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीचे आदर्श म्हणून उदयास आलेल्या आदित्य प्रताप सिंह, दुर्गेश सिंग, वरुण शाही यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीत चांगला वापर केला. त्यांच्या पदवीने देखील यात मदत केली. वरुण शाही (वय 35) हे बी कॉम पास आहेत, आदित्य सिंह विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत, दुर्गेश सिंग यांनी एमबीए केले आहेत.

वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला

या तिघांनीही आपल्या जिद्दीने व मेहनतीने सहा महिन्यांत चांगले परिणाम दाखवले आणि इतर शेतकर्‍यांनाही सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केले. वरुण शाही शेतीचे काम पाहतात, आदित्य सिंह पेरणीपासून काढणीपर्यंत वैज्ञानिक पध्दतीचा उपयोग करतात. एमबीए पदवी धारक दुर्गेश फळे आणि भाज्यांचे विपणन आणि व्यवस्थापन करतात.

अरेरे! आईनं सोडलं, वडील तुरूंगात; ९ वर्षाच्या चिमुरड्यावर आली रस्त्यावर राहण्याची वेळ

या तीघांचे सेंद्रिय शेतीचे काम सुरळीत सुरू असताना पिकांच्या विक्रीवर लॉकडाऊनचा धोका होता. त्याचवेळी त्यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला  बिझनेस कनेक्ट केला आणि त्यांचे फळं, भाज्या ऑनलाइन विक्री करण्यास सुरवात केली. बनारस, जौनपूर, अलाहाबादचे व्यापारी वाजवी दराने विक्रीसाठी उपलब्ध सेंद्रिय पिके पाहून घाऊक खरेदीसाठी पुढे आले. यानंतर, सेंद्रिय पद्धतीने महाराजगंजमधून पिकलेली फळे आणि भाज्या महानगरांपर्यंत पोहोचू लागल्या.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश