शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

यामुळे आहे पुणे मुंबईपेक्षा वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 12:06 PM

पुणं श्रेष्ठ की मुंबई हा तर नेहमीच्या वादविवादाचा विषय पण ही काही कारणं आहेत जी पुण्याला सरस ठरवतात.

ठळक मुद्दे सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख. शिक्षणासाठी अनेक मुंबईकर पुण्यात गेले आहेत तर नोकरीसाठी अनेक पुणेकर मुंबईत आले.नक्की कोणतं शहर चांगलं याविषयी अनेकवेळा चर्चा रंगतात. यातून अनेकदा लाडिक वादही निर्माण होतात.

पुणे आणि मुंबई ही एकाच राज्यातील दोन महत्त्वाची शहरं. सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख. या दोन्ही शहरातील नागरिकांना आपल्या शहराचा प्रचंड अभिमान आहे. शिक्षणासाठी अनेक मुंबईकर पुण्यात गेले आहेत तर नोकरीसाठी अनेक पुणेकर मुंबईत आले. त्यामुळे नक्की कोणतं शहर चांगलं याविषयी अनेकवेळा चर्चा रंगतात. यातून अनेकदा लाडिक वादही निर्माण होतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला दोन्ही शहरं का प्रसिद्ध आहेत  आणि पुण्यालाच जास्त का महत्त्व दिलं जातं, याविषयी आज माहिती देणार आहोत.

थंड हवामान

मुंबईचं वातावरण दमट आहे. त्यामानाने पुणे हे शहर फार उष्ण वातावरणासाठी  प्रसिद्ध आहे. त्यामुळे हवा-बदल करण्यासाठी अनेक मुंबईकर पुण्यात येत असतात.

पावलापावलावर रम्य स्थळे

पुण्यात अगदी तासाभरात आपण भरपूर निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. पश्चिम घाटावर तर पर्यटकांची ये-जा सुरू असतेच. शिवाय येथे ट्रॅफिकचाही गोंगाट फार कमी असतो. त्यामुळे अगदी तासाभरात आपल्याला हवं असलेल्या ठिकाणी आपण सुरळीत पोहोचू शकतो.

खवय्यांचे माहेर

पुण्यातील खाद्यपदार्थांविषयी काही नवं सांगायलाच नको. केवळ तिथली चव चाखण्यासाठी विविध शहरातील लोक पुण्यात दाखल होत असतात. पुण्यातील अनेक हॉटेल्सही फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुंबईतून काहीजण खास जेवणासाठीही पुण्यात येतात आणि जेवणाचा यथेच्छ  आनंद घेतात.

थंडीचं  उबदार वातावरण

पुण्यातील थंडी तुम्ही कधी अनुभवली आहे का? पुण्यात अनेक रम्य ठिकाणं आहेत, त्यामुळे हिवाळ्यात अनेक पर्यटक खास थंडी अनुभवण्यासाठी पुण्यात येत असतात.

दर्जेदार शैक्षणिक संस्था

पुण्याला शैक्षणिक राजधानीही म्हणतात. पुण्यातील बहुतेक सगळ्याच शैक्षणिक संस्था देशभरात फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे देशभरातील लोक येथे शिकायला येतच असतात. डि.वाय.पाटील, फर्ग्युसन कॉलेज, सिम्बॉसिस, भारतीय विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, एफटीआय अशा अनेक शैक्षणिक संस्था देशभरात नावाजलेल्या आहेत. पुण्याला पूर्व भारतातील ऑक्सफर्ड असंही म्हणतात.

निवृत्त नगरी

पुण्याला निवृत्त नगरी असंही म्हणतात. नोकरीतून निवृत्त झाल्यावर पुण्यात स्थायिक झालेले कित्येकजण आनंदाने आयुष्याची संध्याकाळ व्यतित करत आहेत. पण सध्या आयटी क्षेत्रात क्रांती झाल्याने पुण्यातही अनेक आयटी कंपन्या आल्या आहेत. मात्र त्यामुळे पुण्यातील शांतता अजिबात भंग झालेली नाही. पुण्यासारखं शांत आणि सुंदर शहर महाराष्ट्रात नाही असं कित्येकजण सांगतात.

सांस्कृतिक नगरी

पुण्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल कित्येकांना माहितच असेल. पुण्याला ज्याप्रमाणे इतिहास लाभला त्याचप्रमाणे पुण्याने परंपरेने चालत आलेला सांस्कृतिक वारसाही जपला आहे. गणेश चतुर्थी म्हणेज पुण्यातील शानच आहे.

आकर्षक घरे

कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण काहीजण असं म्हणतात की, पण पुण्यातील घरं मुंबईतील घरांपेक्षा फार चांगली आणि सुटसुटीत आहेत. पुण्यातील अनेक घरांसमोर मोठ-मोठी दालने, खिडक्या आणि बाल्कनी आहेत.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबई