शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत वन विभाग गंभीर होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -जंगलामध्ये वाढत जाणाऱ्या अतिक्रमणामुळे वन्यजीव नागरीवस्तीमध्ये शिरण्याच्या घटना वाढत असून, यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -जंगलामध्ये वाढत जाणाऱ्या अतिक्रमणामुळे वन्यजीव नागरीवस्तीमध्ये शिरण्याच्या घटना वाढत असून, यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यात मानवाकडून वन्यजीवांना ठार मारण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात असून, जळगाव तालुक्यातच गेल्या सहा महिन्यात एकूण ३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे; मात्र याप्रकरणी वन विभागाकडून कोणतेही ठोस कारण देण्यात आले नसून, दोषींवरदेखील कारवाईबाबत वन विभाग लक्ष द्यायला तयार नाही.

सोमवारी तालुक्यातील विटनेर वनक्षेत्रातील कम्पार्टमेंट ४३८ मध्ये एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या बिबट्याने मृत नीलगाय खाल्ल्याने विषबाधा होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याआधी याच भागात डिसेंबर महिन्यात एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला होता. तर जानेवारी महिन्यात ममुराबाद शिवारातदेखील एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे ममुराबाद शिवारातील बिबट्या अन्य भागात मारून, त्याचा मृतदेह या शिवारात आणून फेकला होता. त्या बिबट्यावरदेखील विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला होता. बिबट्यांवर विषबाधासारखे प्रयोग होत असताना, वन विभागाकडून असले प्रयोग रोखण्यास पूर्णपणे अपयश येत आहे.

तीन दिवसांपासून नीलगायचा मृतदेह पडून कसा राहतो?

विटनेर शिवारात बिबट्यांसह नीलगाय व इतर वन्यप्राणीदेखील आहेत. त्यानुसार वन विभागाकडून सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे, तसेच नियमित जंगलात गस्त मारणेदेखील गरजेचे आहे. या जंगलात तीन दिवसांपासून एक नीलगायचा मृतदेह पडून असतो, त्या गायीचा मृतदेहावर विषप्रयोग केला जातो व त्या गायीचे मास खाल्ल्यामुळे बिबट्याचा मृत्यू होतो. जर वन विभागाने वेळीच गस्त करून, याकडे लक्ष दिले असते तर बिबट्याचा मृत्यू झालाच नसता. या भागातील वनरक्षक फिल्डवर जात नसल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त होत आहेत. याबाबत चौकशी करण्याची मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करणार तक्रार

बिबट्यांच्या मृत्यूला वन विभागाचा उदासीन कारभार जबाबदार असून, वन अधिकारी व कर्मचारी नियमित जंगलात गस्त करत नसल्याने या घटना वाढत असल्याने याबाबत संबंधित वन अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

व्हिसेरा मिळण्याची सहा महिन्यांची प्रतीक्षा

बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बिबट्याचा व्हिसेरा नाशिक येथे पाठविण्यात आला आहे. ममुराबाद येथे मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सहा महिने होऊनदेखील व्हिसेराचा अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल मिळण्यास होणाऱ्या उशीरबाबतदेखील लक्ष देण्याची गरज आहे.