शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही बी माणसं आहोत....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

लेखक- प्रा. डॉ. सतीश मस्के, पिंपळनेर रस्त्याने जाता-जाता भांडे घासणाऱ्या एक मावशी भेटल्या. थांबलो अन् त्यांना विचारले, ‘काय ...

लेखक- प्रा. डॉ. सतीश मस्के, पिंपळनेर

रस्त्याने जाता-जाता भांडे घासणाऱ्या एक मावशी भेटल्या. थांबलो अन् त्यांना विचारले,

‘काय चाललंय मावशी’

‘काही नाही, काम करून घरी जातेय सर.’

‘इतक्या उशिरा’

‘हो मग काय करावे सर, आता कामे वाढली आहेत.’

‘प्रत्येकाच्या घरी बाहेर शिकायला गेलेली मुलं कोरोनामुळे घरी आली आहेत. त्यो मोठा आजार आलाय म्हणं. त्यांना सुट्या दिल्या आहेत.’

‘मी हसत-हसत म्हणालो, तुम्हाला नाहीत सुट्या.’

‘आम्हाला कशाच्या आल्यात सुट्या... आम्हा गरिबाचं काय खरं हाय...आम्ही कुणाच्या मापात नाहीत. आमचं हातावर पोट हाय. काम केलं तर खायला मिळतंय. आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नोकरदार माणसांचा वेगळाच आहे. खरं तर उलट मला आता जास्त काम लागत आहे. कपडे, भांडे जास्तीचे धुवावे लागत आहेत. म्हणून घरी जायला ह्यो टाइम झाला आहे. आम्ही काम केलं तरच पोटाला मिळणार आहे. आमच्या मुलाबाळांना खायला मिळणार आहे. आमचा न सरकार न कोण बी विचार करीत नाही वो सर.’

‘हो मावशी, तुमचं म्हणणं सारं खरं आहे; पण कोरोना नावाचा महाभयंकर आजार आला आहे.’

‘हो सर, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. तुम्हाला तरी सरकारने सुट्या दिल्या आहेत. सरकार पगार देईन; पण आमच्यासारख्या गरिबांचे काय? बेहाल आहेत. आमच्याकडे लोक कामगार म्हणून बघतात. आमच्या भावना, दुःख, व्यथा, वेदना याचं काहीच कुणाला देणं-घेणं नाही. काय करावे, कुणाला सांगावे? नशिबाचे भोग आहेत सारे.’‘हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे... मावशी; पण तुम्ही कोरोनापासून बचाव करा. सगळ्यांची काळजी घ्या.’

‘हो, पण कशाची आली काळजी, हल्ली माणसं माणसासारखी वागत नाहीत. पहिला जमाना आता राहिला नाही. पहिल्या काळासारखी माणसं माणुसकीची राहिली नाहीत. बाई घरकामाला लावली म्हणजे तिच्याकडून किती काम करून घ्यावं हे नोकरदार, पैशावाल्या, पगारदार माणसांना समजतच नाही... काय करावं, काम केल्याशिवाय गत्यंतर नाही.’

‘हो मावशी, माणसं आता पहिल्यासारखी राहिली नाहीत. माणुसकी विसरत चालली आहेत. कोणाला कोणाचं देणं-घेणं राहिलेलं नाही. तरीही तुम्ही कोरोनापासून सावध राहा. तुमची, तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. येतो.’

‘हो ठीक आहे, काळजी घेतो; पण आम्ही कामगार माणसं, कामावाली माणसं.’ ‘आम्ही बी माणसं आहोत’ हे मात्र आजची हल्लीची माणसं विसरत चालली आहेत.

खरे तर त्या मावशीचे बोलणे ऐकून समाजातील मानवता हरवत चालली आहे असेच चित्र दिसत आहे. म्हणून वेळप्रसंगी माणसाने माणसाला समजून घेऊन माणुसकीने वागणे महत्त्वाचे आहे. कोरोनाने खूप काही शिकविले आहे हे प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवे. माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे. स्वार्थ, अहंकार, मोठेपणा, जात, धर्म बाजूला फेकला पाहिजे. प्रेम आणि मानवतेचा धर्म जागवायला हवा.