शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेसहा लाख ठेवीदार ठेवींच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST

जळगाव : बीएचआर संस्थेसोबतच जिल्ह्यातील इतरही सहकारी पतसंस्थांनीमध्येदेखील बेसुमार कर्ज वाटप व वसुलीचा अभाव असल्याने पतसंस्थांची आर्थिक स्थिती खालावली ...

जळगाव : बीएचआर संस्थेसोबतच जिल्ह्यातील इतरही सहकारी पतसंस्थांनीमध्येदेखील बेसुमार कर्ज वाटप व वसुलीचा अभाव असल्याने पतसंस्थांची आर्थिक स्थिती खालावली व जिल्ह्यातील तब्बल साडे सहा लाख ठेवीदारांच्या दोन हजार कोटींच्या ठेवी अजूनही मिळालेल्या नाही. त्यामुळे सहकारातून उद्धार न होता केवळ स्वाहाकार झाल्याचे या वरून स्पष्ट होते.

बीएचआर संस्थेतील अपहार व इतर कारणांमुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावात चौकशी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील इतरही सहकारी संस्थेतील कारभार चर्चेत येत आहे.

सहकार विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण ६१२ पतसंस्था आहेत. यात ११० संस्था अडचणीत असल्याचे सांगितले जात असून ५४ संस्था अवसायनात आहे. तर ३७ संस्थांवर प्रशासक आहेत. या संस्था अडचणीत येण्यास अथवा त्यावर अवसायक येण्यासाठी संस्थांचा कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.

जिल्ह्यात पतसंस्था भरभराटीचा जो काळ होता, त्या वेळी संचालक मंडळाने स्वत:चे नातेवाईक अथवा जवळच्या मंडळींना बेसुमार कर्ज वाटप केले. यामुळे पतसंस्था डबघाईस आल्या व ठेवीदार हवालदिल झाले. तब्बल १० ते ११ वर्षांपासून या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदार संस्था तसेच शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र काहीही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

अवसायक येऊनही ठेवीदार वाऱ्यावरच

बीएचआर संस्थेत अवसायक आल्यानंतरही ज्या प्रमाणे ठेवीदारांना त्यांची पूर्ण रक्कम मिळू शकली नाही, तिच स्थिती इतरही पतसंस्थांची आहे. या संस्थांवर प्रशासक आल्याने ठेवी मिळतील, यामुळे ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र प्रत्यक्षात संस्थांच्या वसुलीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आजही जिल्ह्यातील साडेसहा लाख ठेवीदारांना ठेवी मिळालेल्या नाही. ठेवींचा हा आकडा जवळपास दोन हजार कोटींवर असून एवढी वसुली कधी होईल व ती ठेवीदारांना कशी मिळेल, याचे उत्तर आज तरी पतसंस्थांकडे नाही.

ठेवीदार समिती नेमणुकीविषयी केवळ चालढकल

कोणतीही संस्था अडचणीत आल्यानंतर त्यावर प्रशासक नेमला जातो. या सोबतच तेथे ठेवीदारांची समिती नेमावी, असा सहकार कायदा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत गेले व संस्थांवर केवळ प्रशासकच आहे. ठेवीदार समिती नेमणुकीविषयी वारंवार मागणी होऊनही त्या विषयी हालचाली झाल्या नाही व एवढ्या वर्षांपासून केवळ चालढकलच सुरू असल्याचे चित्र सहकारी संस्थांमध्ये आहे. त्यामुळे सहकारातून उद्धार होताना केवळ संचालकांनी स्वत:चा व नातेवाईकांचाच उद्धार करून घेतल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.