शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बारावी पुरवणी परीक्षेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर, तर दहावीची पुरवणी ...

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर, तर दहावीची पुरवणी परीक्षा ही २१ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान, या परीक्षा कालावधीत विद्यार्थी अभ्यासाचा ताण आणि परीक्षेच्या भीतीमुळे दडपणाखाली येऊन नकारात्मक विचार करतात व कधी- कधी टोकाची भूमिका घेतात, अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व निकोप वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, म्हणून नाशिक विभागीय मंडळांकडून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी दिली.

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहेत. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा घेतली जाणार असून, दहावीची लेखी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होईल. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होईल. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या ताणतणाव विषयक समस्यांचे व शंकांचे निरसन करण्यासाठी व अनिष्ट घटना टाळण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सुविधा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी असेल.

...असे आहेत समुपदेशक

नाशिक जिल्ह्यासाठी किरण बावा, धुळे जिल्ह्यासाठी नंदकिशोर उद्धवराव बागूल, जळगाव जिल्ह्यासाठी बापू माधव साळुंखे यांची, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी राजेंद्र माळी यांची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुरवणी परीक्षेसाठी भरारी पथकांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परीक्षार्थी संख्या अशी...

बारावीची पुरवणी परीक्षा ही जिल्ह्यातील आठ केंद्रांवर होणार आहे. त्यात हाजी नूर म. चाचा ज्यु. महाविद्यालय (जळगाव), पी.ओ. नाहाटा महाविद्यालय (भुसावळ), कोतकर महाविद्यालय (चाळीसगाव), धनाजी नाना महाविद्यालय (एरंडोल), शेठ मु.मा. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (पाचोरा), कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय (चोपडा), किसान महाविद्यालय (पारोळा) या केंद्रांचा समावेश आहे. १४३ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहे, तसेच दहावीची पुरवणी परीक्षा ही तेरा केंद्रांवर होईल, तर १०२ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.