शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

वीज कडाडताच मोबाइल करा बंद, झाडांपासून राहा दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST

(डमी ९२२) अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, ढगांच्या ...

(डमी ९२२)

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, ढगांच्या गडगडाटासह दरवर्षी विजादेखील पडत असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानीदेखील होत असते. जिल्ह्यातदेखील वीज पडून मृत्यू होणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात बाहेर असताना नागरिकांनी मोबाइल बंद करणे तसेच झाडांपासून दूर राहिल्यास अंगावर वीज पडण्याच्या शक्यतेपासून काही प्रमाणात सुरक्षित राहता येता येऊ शकते. विशेष म्हणजे मान्सूनच्या आगमनावेळेस वीज पडण्याचा घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. वीज पडताना प्राथमिक स्तरावर मोबाइल बंद करणे किंवा झाडाखाली उभे न राहणे अशी काळजी घेतली तरी विजेपासून काही अंशी सुरक्षित राहता येऊ शकते.

वीज पडताच ही घ्या काळजी

वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना मोबाइल फोन बंद ठेवा. तो चार्जिंगला लावला असेल तर चार्जिंग बंद करून चार्जरची वायर प्लगमधून बाजूला काढून ठेवा. कदाचित फोन चालू असल्यास व त्यावर कॉल आल्यास घेऊ नका. तसेच शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा. शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसावे, झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.

कोणाला किती मिळाली नुकसानभरपाई

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत वीज पडून मृत झालेल्यांपैकी १२ जणांना नुकसानभरपाई मिळाली आहे. त्यात सर्व शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाकडून विजांमुळे मृत पावलेल्या नागरिकांना चार लाखांची नुकसानभरपाई दिली जाते. विशेष करून शेतात काम करणारे मजूर व शेतकऱ्यांसाठी शासनाने ही विशेष तरतूद केली आहे. तसेच विजांमुळे मृत पावणाऱ्यांमध्ये ८० टक्के शेतकरी व मजुरांचाच समावेश असतो. यासह मृत जनावरांबाबतदेखील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात असते.

वीज पडल्याने झालेले मृत्यू

२०१८ - ११ मनुष्य , १९ जनावरे

२०१९ - १४ मनुष्य - १७ जनावरे

२०२० - ११ मनुष्य - २१ जनावरे

२०२१ - ५ मनुष्य - १० जनावरे

जिल्ह्यात २४ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा

काही वर्षांमध्ये वीज पडून मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. या कारणांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा तयार केली जात असते. जळगाव जिल्ह्यात एकूण २४ ठिकाणी ही यंत्रणा प्रशासनाच्या माध्यमातून बसविण्यात आली आहे. यासह खासगी मोबाइल टॉवरवरदेखील ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने, आता ग्रामीण भागातदेखील मोबाइल टॉवरमुळे विजेपासून काही अंशी सुरक्षा ही मिळत असते. जळगाव शहरात महापालिकेसह अनेक शासकीय कार्यालयांवरदेखील ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.