शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

मुक्ताईनगरात पूर्वहंगामी कापसाची लागवडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:32 IST

कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने गुंठा किंवा एकरभरही पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली नाही. तालुक्याच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.

ठळक मुद्देअन्यथा दरवर्षी होते दीड हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवडघटते जलस्तर मोठी चिंतेची बाब

मुक्ताईनगर, जि.जळगाव : कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने गुंठा किंवा एकरभरही पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली नाही. तालुक्याच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटण्याचे फटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा घटते जलस्तर आणि मान्सून लांबणीवर जाण्याचे संकेत पाहता मे महिन्यातील पूर्वहंगामी बागायती कापूस लागवडीबाबत पाठ फिरवली आहे.शासन दरबारी तालुक्यातील पावसाची सरासरी ६५० मि.मी. इतकी आहे. गेल्या तीन वर्षापासून पावसाने आखडता हात घेतल्याने सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी होत आहे. गेल्या वर्षी फक्त ३५७ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. तापी-पूर्णा नदीचे सानिध्य असलेल्या तालुक्यात दोन्ही नद्यांना कमी अधिक प्रमाणात बारमाही जलाशय कायम असते. यंदा मात्र दोन्ही नद्यांमध्ये पाण्याची परिस्थिती बेताची आहे. तापी पात्रात अनेक ठिकाणी तोडे पडले आहेत तर नुकतेच हतनूर धरणातून आवर्तन सोडले गेल्याने पूर्णा पात्रात पाणी तळाशी आले आहे.पाण्याची विदारकस्थितीकेळी उत्पादक पट्टा उचंदे, अंतुर्ली परिसरात पूर्व हंगामी बागायती कापसाची लागवड प्राधान्याने केली जाते, परंतु यंदा पाण्याची विदारक परिस्थिती पाहता त्यांनीदेखील पूर्वहंगामी कापसाची लागवड केलेली नाही. दुसरीकडे पूर्वहंगामी कापसाची लागवड केल्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाबाबत धोका अधिक असतो. गेल्या तीन वर्षात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पूर्वहंगामी कापसाची लागवडीवरच दिसून आला होता. त्यामुळे लागवड करू नये असा सल्ला सातत्याने कृषी विभागामार्फत दिला जात होता. याचादेखील परिणाम तालुक्यातील पूर्वहंगामी बागायती कापूस लागवडीवर झाला आहे.घटते जलस्तर मोठी चिंतेची बाबतालुक्यातील जमिनीतील जलस्तर यावेळी कमालीचे घटले आहे. विहरितील पाणी पूर्णपणे आटले आहे. बागायती केळी उत्पादक शेतकºयांना केळी वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. दरम्यान, घटते जलस्तर आणि मान्सून लांबणीवर जाण्याचे संकेत पाहता शेतकºयांनी बागायती कापूस लागवडीचा धोका वाटत असल्यानेच शेतकºयांनी पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीMuktainagarमुक्ताईनगर