शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

मुक्ताईनगरात पूर्वहंगामी कापसाची लागवडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:32 IST

कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने गुंठा किंवा एकरभरही पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली नाही. तालुक्याच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.

ठळक मुद्देअन्यथा दरवर्षी होते दीड हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवडघटते जलस्तर मोठी चिंतेची बाब

मुक्ताईनगर, जि.जळगाव : कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने गुंठा किंवा एकरभरही पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली नाही. तालुक्याच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटण्याचे फटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा घटते जलस्तर आणि मान्सून लांबणीवर जाण्याचे संकेत पाहता मे महिन्यातील पूर्वहंगामी बागायती कापूस लागवडीबाबत पाठ फिरवली आहे.शासन दरबारी तालुक्यातील पावसाची सरासरी ६५० मि.मी. इतकी आहे. गेल्या तीन वर्षापासून पावसाने आखडता हात घेतल्याने सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी होत आहे. गेल्या वर्षी फक्त ३५७ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. तापी-पूर्णा नदीचे सानिध्य असलेल्या तालुक्यात दोन्ही नद्यांना कमी अधिक प्रमाणात बारमाही जलाशय कायम असते. यंदा मात्र दोन्ही नद्यांमध्ये पाण्याची परिस्थिती बेताची आहे. तापी पात्रात अनेक ठिकाणी तोडे पडले आहेत तर नुकतेच हतनूर धरणातून आवर्तन सोडले गेल्याने पूर्णा पात्रात पाणी तळाशी आले आहे.पाण्याची विदारकस्थितीकेळी उत्पादक पट्टा उचंदे, अंतुर्ली परिसरात पूर्व हंगामी बागायती कापसाची लागवड प्राधान्याने केली जाते, परंतु यंदा पाण्याची विदारक परिस्थिती पाहता त्यांनीदेखील पूर्वहंगामी कापसाची लागवड केलेली नाही. दुसरीकडे पूर्वहंगामी कापसाची लागवड केल्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाबाबत धोका अधिक असतो. गेल्या तीन वर्षात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पूर्वहंगामी कापसाची लागवडीवरच दिसून आला होता. त्यामुळे लागवड करू नये असा सल्ला सातत्याने कृषी विभागामार्फत दिला जात होता. याचादेखील परिणाम तालुक्यातील पूर्वहंगामी बागायती कापूस लागवडीवर झाला आहे.घटते जलस्तर मोठी चिंतेची बाबतालुक्यातील जमिनीतील जलस्तर यावेळी कमालीचे घटले आहे. विहरितील पाणी पूर्णपणे आटले आहे. बागायती केळी उत्पादक शेतकºयांना केळी वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. दरम्यान, घटते जलस्तर आणि मान्सून लांबणीवर जाण्याचे संकेत पाहता शेतकºयांनी बागायती कापूस लागवडीचा धोका वाटत असल्यानेच शेतकºयांनी पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीMuktainagarमुक्ताईनगर