शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

मुक्ताईनगरात पूर्वहंगामी कापसाची लागवडच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:32 IST

कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने गुंठा किंवा एकरभरही पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली नाही. तालुक्याच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.

ठळक मुद्देअन्यथा दरवर्षी होते दीड हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवडघटते जलस्तर मोठी चिंतेची बाब

मुक्ताईनगर, जि.जळगाव : कापूस उत्पादक तालुका म्हणून नावारूपास आलेल्या व कापसाची बाजारपेठ असलेल्या तालुक्यात दरवर्षी मे महिन्यात पूर्वहंगामी व बागायती कापूस पेरणीची आघाडी असते. सरासरी दीड हजार हेक्टर कापसाची पूर्वहंगामी लागवड येथे केलली जाते. यंदा मात्र पाण्याची बिकट परिस्थिती असल्याने गुंठा किंवा एकरभरही पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली नाही. तालुक्याच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटण्याचे फटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा घटते जलस्तर आणि मान्सून लांबणीवर जाण्याचे संकेत पाहता मे महिन्यातील पूर्वहंगामी बागायती कापूस लागवडीबाबत पाठ फिरवली आहे.शासन दरबारी तालुक्यातील पावसाची सरासरी ६५० मि.मी. इतकी आहे. गेल्या तीन वर्षापासून पावसाने आखडता हात घेतल्याने सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी होत आहे. गेल्या वर्षी फक्त ३५७ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. तापी-पूर्णा नदीचे सानिध्य असलेल्या तालुक्यात दोन्ही नद्यांना कमी अधिक प्रमाणात बारमाही जलाशय कायम असते. यंदा मात्र दोन्ही नद्यांमध्ये पाण्याची परिस्थिती बेताची आहे. तापी पात्रात अनेक ठिकाणी तोडे पडले आहेत तर नुकतेच हतनूर धरणातून आवर्तन सोडले गेल्याने पूर्णा पात्रात पाणी तळाशी आले आहे.पाण्याची विदारकस्थितीकेळी उत्पादक पट्टा उचंदे, अंतुर्ली परिसरात पूर्व हंगामी बागायती कापसाची लागवड प्राधान्याने केली जाते, परंतु यंदा पाण्याची विदारक परिस्थिती पाहता त्यांनीदेखील पूर्वहंगामी कापसाची लागवड केलेली नाही. दुसरीकडे पूर्वहंगामी कापसाची लागवड केल्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाबाबत धोका अधिक असतो. गेल्या तीन वर्षात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पूर्वहंगामी कापसाची लागवडीवरच दिसून आला होता. त्यामुळे लागवड करू नये असा सल्ला सातत्याने कृषी विभागामार्फत दिला जात होता. याचादेखील परिणाम तालुक्यातील पूर्वहंगामी बागायती कापूस लागवडीवर झाला आहे.घटते जलस्तर मोठी चिंतेची बाबतालुक्यातील जमिनीतील जलस्तर यावेळी कमालीचे घटले आहे. विहरितील पाणी पूर्णपणे आटले आहे. बागायती केळी उत्पादक शेतकºयांना केळी वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. दरम्यान, घटते जलस्तर आणि मान्सून लांबणीवर जाण्याचे संकेत पाहता शेतकºयांनी बागायती कापूस लागवडीचा धोका वाटत असल्यानेच शेतकºयांनी पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळली असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीMuktainagarमुक्ताईनगर