शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

धरण, धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST

स्टार - ११६७ सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीचा पाऊस चांगला झाल्याने जवळपास जळगाव ...

स्टार - ११६७

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीचा पाऊस चांगला झाल्याने जवळपास जळगाव जिल्ह्यातील सर्वच धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे धबधबे व ओसंडून वाहणारे धरणे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, धबधबा पाहण्यापेक्षा आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे, मोबाईलवर सेल्फी काढण्याचं फॅड गेल्या काही वर्षांमध्ये बरंच वाढलं आहे. पण त्यासोबतच दुर्दैवाने सेल्फी काढताना झालेल्या दुर्घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. तसाच प्रकार सध्या पहायला मिळत आहे़ त्यामुळे पर्यटकांनी संपूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी शहरात आणि जिल्ह्यात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यामुळे यावल तालुक्यातील मनुदेवी येथील व चाळीसगावातील पाटणादेवी येथील धबधबाही खळाळून वाहू लागला आहे. दुसरीकडे जळगावातील कांताई धरणातसुद्धा पाण्याची पातळी वाढली आहे. तर जळगावपासून ६० किमी अंतरावर असलेल्या अजिंठा लेणी येथील धबधबा खळाळून वाहू लागला आहे. धबधब्याचे हे रूप पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची या ठिकाणी गर्दी होत आहे. धबधब्याचा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असून उंचावरून कोसळणारा धबधबा पाहतानाच तेथे सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना अनावर होत आहे. स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालून सेल्फी काढणारे नागरिक येथे पहावयाला मिळत आहेत. वनविभाग, स्थानिक संस्था तसेच पोलिसांकडून होत असलेल्या विरोधाला तसेच सुरक्षेबाबतच्या सूचनांना न जुमानता तरुणाई सेल्फीला प्राधान्य देत असल्याचे पहावयास मिळत होते.

पर्यटनाला जा, पण काळजी घ्या

धबधबे, धरण तसेच तलावांच्या ठिकाणी पर्यटकांनी सतर्क राहण्याचे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा जिवावर बेतू शकते़ धबधबा खळाळून वाहत असताना त्याच्या जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. तसेच धरण व तलावांमध्ये पोहणे टाळावे. अनेकजण ज्या भागात मनाई असते, त्या भागात फिरण्यासाठी जातात किंवा पोहण्यासाठी जातात. त्यामुळे अनेकांचा बुडून मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे ज्या भागात मनाई आहे, अशा ठिकाणी जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

तरीही जुमानत नाहीत !

मनुदेवी येथील धबधब्याच्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले असून धबधब्याच्या पन्नास ते साठ फूट अंतरावर कंपाऊंड बांधण्यात आले आहे, जेणेकरून कुणालाही धबधब्याकडे जाता येणार नाही. दुसरीकडे पाटणादेवी येथेही धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहे. जळगावातील कांताई धरण येथे कर्मचारी नेमण्यात आले आहेत़ मात्र, तरीही सूचनांना न जुमानता नागरिक गर्दी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी दोन ते तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.