शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:47 PM

जळगाव - सकाळी घराबाहेर निघालेल्या महिलेने आशाबाबानगर परिसरातील रेल्वेपुलावर धावत्या रेल्वेसमोर स्वत: ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ...

जळगाव- सकाळी घराबाहेर निघालेल्या महिलेने आशाबाबानगर परिसरातील रेल्वेपुलावर धावत्या रेल्वेसमोर स्वत: ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ धनश्री पंकज वसाने (२६, रा़ आशाबाबानगर) असे मयत महिलेचे नाव आहे़ दरम्यान, महिलेचा मृतदेह हा चार तास जागेवरच पडून होता़ मुलीचा शोध घेत असताना पुलावर काय गर्दी आहे, हे पाहण्यासाठी गेलेल्या वडीलांना मुलीचाच मृतदेह आढळून आल्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला़आशाबाबा नगरात श्रीराम राजाराम चौधरी हे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत़ ते विद्यापीठातील कर्मचारी आहेत़ दरम्यान, त्यांची मुलगी धनश्री हिचे पंकज वसाने यांच्याशी लग्न झाले होते़ परंतू, काही वर्षानंतर पंकज यांचे निधन झाल्यामुळे धनश्री या वडीलांकडे आशाबाबानगरात राहत होत्या़ मात्र, काही महिन्यांपासून त्या मानसिक आजारात होत्या़ मंगळवारी सकाळी श्रीराम चौधरी हे ड्युटीसाठी निघून गेले तर त्यांच्या पत्नी सुध्दा बाहेर गेल्या होत्या़ त्याचदरम्यान, धनश्री या घराबाहेर निघाल्या़ काहीवेळानंतर आशाबाबानगर रेल्वे पुलावर त्यांनी रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली़नागरिकांना हटकले़़़दरम्यान, धनश्री वसाने या रेल्वे रूळाजवळ फिरत असताना नागरिकांना ते हटकले होते़ त्यामुळे त्या काही अंतर आणखी पुढे चालत गेल्या़ त्यानंतर घटना घडली़ डोक्याला व शरिराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला़ कुणीतरी आत्महत्या केल्यामुळे नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली़ त्यामुळे बघ्यांची गर्दी झालेली होती़आणि मुलगी दिसली मृतावस्थेतमुलगी धनश्री ही कुठतरी निघून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर वडील श्रीराम हे दुपारपासून तिचा शोध घेत होते़ अखेर सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना आशाबाबानगर पुलाजवळ काही तरी घटना घडली अशी माहिती मिळाली़ त्यांनी त्वरित त्याठिकाणी धाव घेतली़ अन् त्यांना रेल्वेच्या धक्कयामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे दिसले़ जागेवरच हंबरडा फोडत काहीवेळानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली़चार तास मृतदेह पडूनदुपारी साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास घटना घडल्यानंतर लोहमार्ग व रामानंदनगर पोलिसांना माहिती न मिळाल्यामुळे तब्बल ४ चार मृतदेह जागेवर पडून होता़ अखेर सायंकाळी मयत महिलेच्या वडीलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेले़यापूर्वीही त्या निघाल्या होत्या घरूनधनश्री ह्याआॅगस्ट महिन्यात सुध्दा घरातून बाहेर निघून गेल्या होत्या़ त्याबाबत वडील श्रीराम चौधरी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद केली होती़ मात्र, दोन दिवसानंतर त्या पुन्हा घरी परतल्यानंतर चौधरी यांना त्यासंदर्भांत पोलिसांना कळविले होते, अशी माहिती मयत महिलेच्या वडीलांनी दिली़

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव