शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधांमुळे व्यापाराला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरातील व्यापाराचे जवळपास ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

जळगाव शहरातून संपूर्ण जिल्ह्यात आणि बाहेरच्या जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये व्यापार होत होता. मात्र, गेल्यावर्षी ऑगस्टपर्यंत सर्व दुकाने बंद होती. त्यानंतर दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली. हळूहळू व्यापार सुरू झाला. मात्र, तत्पूर्वीच्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. व्यापार सुरू झाला असला, तरी ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमताही कमी झाली होती. त्यामुळे कापड बाजार आणि इतर अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी कमी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. परिस्थिती काहीअंशी सुधारली असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून व्यापारात पुन्हा एकदा अडचणी समोर येऊ लागल्या आहेत. सध्या कापड बाजारात सामसूम जाणवायला लागली आहे.

दुपारी ऊन तर सायंकाळी निर्बंध

जळगाव शहरातील मार्केटमध्ये सध्या दुपारच्या कडक उन्हामुळे फारसे ग्राहक येत नाहीत. ऊन कमी झाल्यावर सायंकाळी पाच वाजल्यानंतर ग्राहक दुकानात येतात तर सात वाजता दुकान बंद करण्याची घाई असल्याने त्याचा फटका व्यापाराला बसत आहे. यामुळे कापड बाजार आणि जनरल स्टोअर्सचा व्यवसाय आता केवळ ३० ते ४० टक्क्यांवर आला आहे.

कोट -

सध्या शासनाने सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना वस्तू बघायला फार वेळ मिळत नाही. दुकाने किमान ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावीत. आधीच दुपारी ऊन असल्याने नागरिक खरेदीसाठी सायंकाळीच बाहेर पडत आहेत. त्यातच लग्न सोहळ्यांवर मर्यादा असल्याने व्यापाराला फटका बसला आहे. शाळा बंद असल्याने गणवेशही विकले गेलेले नाहीत.

- रमेश मताणी, व्यापारी,

दिवसभर तापमान जास्त असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यातच सायंकाळी सात वाजताचे बंधन असल्याने पुरेसा व्यवसायही होत नाही. सततच्या निर्बंधांमुळे शहराबाहेरील नागरिक आता फारसे शहरात येत नाहीत, त्यामुळे व्यापार हळूहळू तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित व्हायला लागला आहे.

- ललित बरडिया, व्यापारी.