शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
5
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
6
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
7
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
9
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
10
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
11
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
12
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
13
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
14
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
15
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
16
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
17
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
18
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
20
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार

सामान्य जनतेसाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:24 IST

रस्ते अपघातातील मृत्यूदर १४ टक्क्यांनी घटला

संजय पाटीलअमळनेर. जि. जळगाव : रस्त्यावरील प्रवाशांसाठी असो की घरातील रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने गेल्या चार वर्षात तब्बल १ लाख १० हजार १४७ रुग्णांना सेवा दिली असून मागील वर्षी ३९१ महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच करण्यात आली. यामुळे अपघात, माता व बाल मृत्यूदर कमी झाले आहेत.जळगाव जिल्ह्यात २६ बीएलएस तर ९ एएलएस म्हणजे अत्याधुनिक ज्यात शॉक देण्याची आणि कृत्रिम श्वास देण्याची सुविधा आहे अशा एकूण ३५ रुग्णवाहिका आहेत. शासनाने तातडीच्या सेवेसाठी अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी १०८ टोल फ्री क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली आहे.१५ मिनिटात १०८ रुग्णवाहिका पोहचू शकते अशी व्यवस्था करून ठिकठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध असून दिवसरात्र रुग्णांची सेवा केली जात आहे. यामध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध असल्याने आणि एका फोनवर रुग्णांना विनामूल्य सेवा दिली जात असल्याने यातून गेल्या चार वर्षात अपघातातील रुग्णांना तसेच गंभीर आजारी पडलेल्या रुग्णांना वेळीच सेवा मिळाल्याने मृत्यूदर घटला आहे. २०१६च्या तुलनेत २०१८मध्ये ४५ हजार ३९८ रुग्णांना १०८ने तात्काळ सेवा पुरवली आहे तर १०८ सुरू झाल्यापासून चार वर्षात सेवा घेणाºयांचे प्रमाण सहापट वाढले आहे आणि माता मृत्यूदर ७ टक्क्यांंनी कमी झाला आहे. बाळ मृत्यूदर ५ टक्यांनी कमी झाला आहे. रस्ते अपघातातील प्रमाण १४ टक्यांनी कमी झाले आहे.२९२८ अपघातातील रुग्णांवर उपचार२०१८ अखेर २९२८ अपघातातील रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना रुग्णालय पोहचविण्याचे काम १०८ ने केले आहे तर हल्ला झालेल्या ६४१ नागरिकांना दवाखान्यात नेऊन उपचार केले आहे. भाजण्याच्या बाबतीत २०१४पासून सर्वाधिक कमी रुग्ण २०१८ मध्ये होते. हृदयविकाराचे रुग्णही गेल्या चार वर्षात कमी झाले असून ४९ रुग्णांना वेळीच रुग्णालयात पोहचविण्यात आले आहे. पडण्यामुळे जखमी झालेल्या ८९० रुग्णांनी १०८चा लाभ घेतला आहे. विषबाधा झालेल्या १८२१ रुग्णांना प्राथमिक उपचार करून ताबडतोब दवाखान्यात पोहचविल्यामुळे अनेकांना वाचवण्यात यश आले आहे.८२५३ गरोदर महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्याचे काम या जीवन वाहिनीने केले. त्यापैकी ३९१ महिलांची प्रसूती सुखरूपपणे १०८ रुग्णवाहिकेत करण्यात आली. विजेचा धक्का बसलेले ३९ रुग्ण आणि मोठ्या अपघातातील १८१ रुग्ण व इतर वैद्यकिय सेवा २७५३२ लोकांना पुरविण्यात आली. २९१०२ इतरांना तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाºया ३२ जणांनाही वाचवण्यात १०८ व त्यावरील सेवा देणाºया डॉक्टरांना यश आले आहे. ७ रुग्णांना कृत्रिम श्वास पुरविण्यात आला आहे.१०८ रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर , शिरीन पंप, इन्फ्युजन पंप इत्यादी सुविधा असल्याने रुग्णाला तात्काळ उपचार सुरू होऊन त्याची मानसिकता प्रबळ होते. शिवाय वेळीच सेवा मिळत असल्याने रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. यामुळे मृत्यूदरही कमी झाले आहे.- डॉ. चेतन अग्नीहोत्री, जिल्हा व्यवस्थापक, १०८, आपत्कालीन व्यवस्था

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव