शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सांडपाण्यामुळे गिरणा नदीचा झाला नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 04:06 IST

जलप्रदूषणामुळे जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर; मलनिस्सारण योजना दोन वर्षांपासून कागदावरच

- अजय पाटील जळगाव : संपूर्ण जळगाव शहरातील सांडपाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने ते थेट तीन नाल्यांद्वारे गिरणा नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. मलनिस्सारण योजना दोन वर्षांपासून मंजूर असून, हा प्रकल्प सुरू व्हायला चार ते पाच वर्षांचा काळ लागणार आहे. तोपर्यंत नदीचा नाला असाच वाहता राहणार आहे.

जळगाव शहराला एका दिवसात जवळपास १०० एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. त्यातून निम्मे पाणी हे सांडपाण्याच्या माध्यमातून गटारीत सोडले जाते. लेंडी, दवंड्या व गुंजारी या तीन नाल्यांद्वारे हे सर्व सांडपाणी थेट गिरणेच्या पात्रात जाते. आधीच बेसुमार वाळू उपसा सुरू असताना या सांडपाण्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शहरासह नदीलगत असलेल्या सर्व गावांचे सांडपाणीही गिरणेत जात आहे. शिवाय आसपासच्या अनेक कंपन्यांचे पाणीही गिरणेतच जाते. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना पर्यावरणवादी संघटनांचे. नदीकाठच्या गावकऱ्यांनाही या प्रश्नाचे देणेघेणे राहिले नाही. जलप्रदूषणामुळे देशी-विदेशी पक्ष्यांची जत्रा भरणाºया गिरणा काठावर आता पक्ष्यांचे थवे दिसेनासे झाले आहेत.

पाच प्रकारचे मासे गिरणा नदीत सापडायची. यातील एक-दोन प्रजातीच शिल्लक असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. शहराचे वैभव समजल्या जाणाºया मेहरूण तलावाचे सुुशोभीकरण होत असताना, परिसरातील सांडपाणी थेट या तलावात सोडले जात आहे.कधीकाळी आकाशाच्या प्रतिबिंबाने निळेशार दिसणारे तलावाचे पाणी या सांडपाण्यामुळे काळेशार झाले आहे. ६२ हेक्टरमध्ये पसरलेल्या आणि एकेकाळी ५८ प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास असलेल्या या तलावाची आज वाईट अवस्था आहे.

वाघांच्या अधिवासाचा साक्षीदार असलेला या तलावाच्या परिसरातील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहे. पंधरा ते वीस सापांच्या प्रजातींचा अधिवास असलेल्या क्षेत्रात आज सात प्रजाती आढळून येतात़ ४० प्रकारची फुलपाखरे, ११८ प्रकारचे विविध कीटक सापडतात. मात्र, जलप्रदूषणामुळे हे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या तलावाच्या सुशोभिकरणापेक्षा शुध्दीकरणाची गरज असल्याचे मत भारती पर्यावरण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुजाता देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

केळीचे क्षेत्र धोक्यात

या परिसरात जवळपास ६० हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. बेसुमार वाळू उपशामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासूनच गिरणा पट्ट्यातील बोअरवेल्स आटतात. त्यामुळे केळीसाठी ओळखल्या जाणाºया सावखेडा ते पळसोदपर्यंतच्या भागातील केळीचे उत्पादन कमी होत आहे.

सांडपाण्यात विषारी बॅक्टेरिया असतात. नद्यांमध्ये हे पाणी मिसळल्यास नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. कंपन्यांमधील विषारी रसायन पाण्यात सोडल्यामुळे नदीमधील जीव जंतू व मासे मरण्याची शक्यता असते.- डॉ. एस. टी. इंगळे, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख,

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

शहरासाठी मलनिस्सारण योजना मंजूर झाली आहे. काही वर्षांनंतर गिरणेत शहराचे सांडपाणी न जाता त्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी त्या पाण्याचा वापर केला जाईल. ही योेजना पूर्ण होत नाही तोपर्यंत गिरणेत जाणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करता येईल का, यावर महापालिका प्रशासन विचार करीत आहे.- डॉ. उदय टेकाळे, आयुक्त, महापालिका, जळगाव

आरोग्यालाही धोका

गिरणेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावांत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सावखेडा शिवारापासून बांभोरी, आव्हाणे, फुपनगरी, नांद्रा, आमोदा ते गाढोदा अशा ४० कि.मी.च्या गिरणा पट्ट्यातील ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील आव्हाणे, आव्हाणी, भोकणी या गावांमध्ये प्रत्येक वर्षी अतीसाराची साथ वाढते आहे.

सांडपाणी प्रक्रिया करून शेतीसाठी वापरले जाणार

शहरासाठी अमृत अंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात १५० कि.मी.चे, तर दुसºया टप्प्यात २५० कि.मी.चे काम होणार आहे. या कामाला किमान चार ते पाच वर्षे लागणार आहेत. या प्रकल्पात सर्व सांडपाण्यावरप्रक्रिया होऊन ते शेतीसाठी वापरले जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावpollutionप्रदूषणWaterपाणी