शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
3
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
4
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
5
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
6
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
7
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
8
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
9
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
10
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
11
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
12
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
13
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
14
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
15
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
16
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
17
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
18
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
19
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
20
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत

अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 7:34 AM

जात, धर्म, भाषा, समुदाय यांचा आधार घेऊन भाजप व काँग्रेसने निवडणुकांत प्रचार करू नये, असा इशारा या दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने बुधवारी दिला होता. संरक्षण दलांविषयीच्या धोरणांबद्दल तसेच त्या दलांच्या सामाजिक-आर्थिक रचनेबाबत फूट पाडणारी विधाने करू नयेत, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला बजावले होते.

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने राजकारण करू नये, असा निवडणूक आयोगाने दिलेला आदेश अत्यंत चुकीचा आहे. सरकारच्या धोरणावर टीका करणे हा विरोधकांचा हक्क आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी म्हटले आहे. 

जात, धर्म, भाषा, समुदाय यांचा आधार घेऊन भाजप व काँग्रेसने निवडणुकांत प्रचार करू नये, असा इशारा या दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने बुधवारी दिला होता. संरक्षण दलांविषयीच्या धोरणांबद्दल तसेच त्या दलांच्या सामाजिक-आर्थिक रचनेबाबत फूट पाडणारी विधाने करू नयेत, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला बजावले होते. अग्निपथ योजनेविषयी काँग्रेसने केलेल्या टीकेबद्दल निवडणूक आयोगाने हा इशारा दिला होता. त्याबद्दल पी. चिदंबरम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अग्निवीर प्रस्तावाला लष्कराचाही होता विरोधचिदंबरम म्हणाले की, अग्निवीर तयार करण्याच्या प्रस्तावाला लष्कराचाही विरोध होता. तरीही ही योजना केंद्र सरकारने राबविण्याचे ठरविले. हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. त्यामुळे ही योजना रद्द करणे आवश्यक बनले आहे. 

नेमके काय म्हणायचेय?- आयोगाला नेमके काय म्हणायचे आहे? अग्निपथ या योजनेतून अग्निवीर तयार होतात. ते सरकारचे धोरण आहे.- त्यावर टीका करू नका, असे निवडणूक आयोगाला म्हणायचे आहे का? सरकारवर टीका करणे हा विरोधकांचा हक्क आहे. विरोधक सत्तेवर आले तर अग्निपथ योजना रद्द करण्यात येईल, असे सांगणेही चुकीचे नाही, असेही पी. चिदंबरम म्हणाले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग