शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

"...हे बेजबाबदारपणाचे लक्षण"; आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 9:23 AM

ज्येष्ठ अधिवक्ता सिंघवी म्हणाले, आमची तक्रार असूनही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नावाचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या कोणत्याही कागदपत्रात नाही. आयोगाने कोणालाही ताकीद दिली नाही किंवा कोणतेही निर्बंध लादले नाहीत. 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाचे पत्र तसेच मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी डेटा संकेतस्थळावर टाकण्यास निवडणूक आयोगाने नकार देणे ही घटनात्मक संस्था असलेल्या निवडणूक आयोगाची कृती निषेधार्ह असून, यामुळे आयोगाचा पर्दाफाश झाल्याचा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगासारखी संस्था अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाकडे झुकली तर याचा अर्थ लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला.

आयोग कोणत्याही पक्षाचा निवडणूक एजंट नाहीज्येष्ठ अधिवक्ता सिंघवी म्हणाले, आमची तक्रार असूनही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नावाचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या कोणत्याही कागदपत्रात नाही. आयोगाने कोणालाही ताकीद दिली नाही किंवा कोणतेही निर्बंध लादले नाहीत. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या स्टार प्रचारकांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करू नये असे सांगितले. या सर्व गोष्टी घटनात्मक पातळीवरील उच्चस्तरीय संस्थेला शोभत नाहीत. हे संस्थेच्या घटनात्मक जबाबदाऱ्यांच्या विरोधात आहे. ते म्हणाले की, हा निवडणूक आयोग आहे, कोणत्याही पक्षाचा निवडणूक एजंट नाही.

जेव्हा कोणतीही घटनात्मक संस्था राज्यघटनेचे पालन करत नाही आणि सत्तेकडे झुकते आहे, तेव्हा लोकशाही धोक्यात आली आहे, हे समजले पाहिजे. भाजप नेते उघडपणे जातीयवादी वक्तव्ये करतात आणि त्याची काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याशी तुलना केली जाते, हे दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते, पण त्याला विरोध करणे दुर्दैवी आणि निषेध करण्यासाठी पुरेसे आहे. यातून निवडणूक आयोगाचा पर्दाफाश होतो.- अभिषेक मनु सिंघवी, प्रवक्ते, काँग्रेस 

टॅग्स :congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा