शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी संरक्षक कायदाच रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST

जळगाव जिल्ह्यात बिबट्यांची उत्पत्ती पाहता अन्नाच्या शोधात ते जंगल सोडून शेतांमध्ये वावरत आहेत. भीतीदायक वातावरणात काम करण्याची स्थिती शेतकऱ्यांवर ...

जळगाव जिल्ह्यात बिबट्यांची उत्पत्ती पाहता अन्नाच्या शोधात ते जंगल सोडून शेतांमध्ये वावरत आहेत. भीतीदायक वातावरणात काम करण्याची स्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात हरण व रानडुक्कर यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. ‘लोकमत’ने याबाबत वाडे, सावदे, दलवाडे परिसरात रानडुकरे आदी वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केले असून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने या संघटनेमार्फत या वृत्ताचे कौतुक करण्यात आले आहे.

शासनाचा वन्य प्राणी संरक्षण कायदा असल्यामुळे शेतकऱ्यांना प्राण्यांना प्रत्युत्तर देता येत नाही. मात्र मागील काही वर्षांपासून बिबट्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला करून घायाळ केले आहे. काही शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. शेतात मजूर कामाला यायला तयार नाहीत. बिबट्या मादी वर्षातून चार पिलांना जन्म देते व वयाच्या चाळिशीपर्यंत पिलांना जन्म देत असते. त्यात नवीन जन्माला घातलेले मादी बिबट्या वर्षातून दोनदा पिलांना जन्म देतात, यांचा गुणाकार केला तर काही दिवसांत प्रत्येक शेतात बिबटेच बिबटे दिसतील व शेतकऱ्यांना नि:शस्त्र त्यांचा सामना करावा लागेल. एक दिवस शेतकरीच त्यांचे खाद्य बनवून देईल, असे या संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

शासनाने वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा अन्यथा शेतकऱ्यांना शस्त्र परवाना द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण करता येईल. हरण, रानडुक्कर, गवा, नीलगाई हे वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात अतोनात नुकसान करत असतात. त्यांचाही बंदोबस्त वन विभागाने करावा, अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय महाजन, उपाध्यक्ष किरण गुजर, सचिन शिंपी, अखिलेश पाटील, विनोद धनगर, खुशाल सोनवणे, नंदलाल पाटील, विनोद पाटील, देवेंद्र पाटील, विजय पाटील, अजित पाटील, वैभव पाटील यांनी ही मागणी केलेली आहे.