शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

तूर खरेदीसाठी दहा केंद्रांवर नोंदणीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जिल्ह्यात लवकरच तूर खरेदीला सुरुवात होणार असून, यासाठी जिल्ह्यातील नाफेडच्या दहा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्ह्यात लवकरच तूर खरेदीला सुरुवात होणार असून, यासाठी जिल्ह्यातील नाफेडच्या दहा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शासनाने यावर्षी आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूरला तब्बल ६ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव निश्चित केला आहे. शासनाकडून १५ जानेवारीपासून तूर खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शासनाने तूर खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केलेले नाही.

जिल्ह्यात दहा केंद्रांवर आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यंदा साडेसात लाख हेक्टर लागवडीयोग्य कृषी क्षेत्रापैकी सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर तूर वाणाची लागवड करण्यात आली होती. यंदा खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तुरीच्या उत्पादनातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी डिसेंबर अखेर आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदीसाठी नोंदणी केंद्र सुरू करण्यात येतात. त्यानुसार तूर खरेदीसाठी जळगाव तालुका कृषी औद्योगिक सर्व सेवा सह.संस्थांसह अमळनेर, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुका खरेदी-विक्री संघ अशा दहा केंद्रांवर नोंदणीस सुरुवात झाली आहे.

या कागदपत्रांची आवश्यकता

आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने शेतकऱ्यांनी एमईएमएल या पोर्टलवर तूर ऑनलाइन नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक, तलाठी यांचा चालू वर्षाचा तूर पीकपेरा ऑनलाइन नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पासबुकवर आयएफएससी कोड स्पष्ट दिसून आल्याची खात्री करावी व खरेदीपूर्वी करारनामा करून नोटरी करण्याचे निर्देश संबंधित शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघांना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विपनन अधिकारी गजानन मगर यांनी ‘लोकमत’ ला दिली.

ज्वारीची खरेदी थांबली

राज्य शासनाने गेल्या आठवड्यात मक्याची खरेदी थांबविल्यानंतर आता ज्वारीचीदेखील खरेदी थांबविली आहे. राज्यात ज्वारीच्या खरेदीसाठी १ लाख क्विंटलचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे शासनाने खरेदी थांबविली आहे. जिल्ह्यात ५ हजार ९५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १ हजार ७०० शेतकऱ्यांकडून ३८ हजार २४८ क्विंटल माल खरेदी करण्यात आला; मात्र अद्यापही ३ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना माल खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांनी आता व्यापाऱ्यांकडेच माल विक्री करावा लागणार आहे. दरम्यान, मक्याचा लक्ष्यांक पूर्ण झाले असले तरीही अनेक शेतकऱ्यांची नोंदणी करूनही माल खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने मका खरेदी पुन्हा सुरू करून नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.