शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दिलासा, मात्र रस्त्यांनी केले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुण राजाने जळगाव शहरासह परिसरावर आपली कृपादृष्टी दाखवली, यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुण राजाने जळगाव शहरासह परिसरावर आपली कृपादृष्टी दाखवली, यामुळे शेतकरी व उकाड्याने हैराण जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा अपयशामुळे खराब रस्त्यांमुळे जळगावकर हवालदिल झाले आहेत. चिखल, खड्डे आणि पाण्याचे डबके तुडवून जळगावकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. पावसानंतर आता शहराच्या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे एक जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात विशेष करून गेल्या तीन वर्षांपासून तर नेहमी हवाहवासा वाटणारा पावसाळा खराब रस्त्यांमुळे जळगावकरांना नकोसा वाटू लागला आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा उदासीनतेमुळेच ही वेळ आली आहे. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांची समस्या निर्माण होत असताना देखील मनपाकडून साधी दुरुस्तीही केली जात नाही.

शहरातील एकूण रस्त्यांची लांबी - ६४५ किमी दुर्दशा झालेल्या रस्त्यांची लांबी - ५७० किमी शहरातील ७५ % रस्त्यांची लागली वाट

आता अमृतच्या नावावर खापर फोडणे बंद करा

गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे खराब रस्त्यांचा समस्येला शहरातील लोकप्रतिनिधींकडून नेहमी अमृतच्या कामांनाच जबाबदार धरण्यात येत होते. मात्र, आता अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर भुयारी गटार योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचा दुरावस्थेला ‘अमृत’वर खापर फोडण्याचे दिवस ही गेले असून, आता जळगावकरांना चांगले रस्ते द्यावेत, अशीच भावना सर्वसामान्य जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.

मुरूम,माती टाकलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य

गेल्या महिन्यात पाऊस झाल्यानंतर रस्त्यांची समस्या निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा प्रश्न मांडल्यानंतर मनपाकडून दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली होती. मात्र, दुरुस्ती करताना अनेक ठिकाणी माती व मुरुमाचा वापर करण्यात आला. ज्याठिकाणी मातीचा वापर करण्यात आला. त्याठिकाणी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मनपाची दुरुस्ती जळगावकरांना चांगलीच महागात पडली आहे.

दुरुस्तीवर केलेला कोट्यवधींचा खर्च जातो कुठे?

महापालिकेने पावसाळ्याआधी ९ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून, रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन केले होते. त्यापैकी मनपाने दिलेल्या माहितीनुसार ४ कोटी रुपयांच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरातील रस्त्यांची स्थिती पाहिली तर दुरुस्तीवर खर्च करण्यात आलेला कोट्यवधींचा निधी गेला तरी कोठे ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

जळगावकरांनी निवडून दिलेले नेते काय म्हणतात...

रस्त्यांची कामे केव्हा होणार?

१०० कोटींचा प्रश्न मार्गी लागल्यावर..

१०० कोटी रुपयांचा निधीमधून रस्त्यांचा कामांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाकडे याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील सातत्याने पाठपुरावा करत असून, राज्य शासनाने स्थगिती उठविली की लवकरात लवकर शहरातील नवीन रस्त्यांचा कामांना सुरुवात करण्यात येईल. - जयश्री महाजन, महापौर

पावसाळ्यानंतर..

शहरातील रस्त्यांचा कामांना अमृत योजनेमुळे ब्रेक लागला होता. आता अमृतची कामे होत आली आहेत. राज्य शासनाकडे स्थगिती असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवरील स्थगिती उठली की कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व पक्षीय मिळून प्रयत्न करू. -सुरेश भोळे, आमदार