शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आशासेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 15:08 IST

आशा सेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आह. याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमानधनात वाढ करासुरक्षा किट देण्याची मागणी

भुसावळ, जि.जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गंभीर स्थितीत सर्व साथीच्या आजाराचे सर्वेक्षण करण्याचे अत्यंत जोखमीचे काम शहरी व ग्रामीण भागात आशा सेविका व गटप्रवर्तक करीत आहेत; परंतु त्यांना आरोग्यविषयक सुरक्षा किटचे वाटप नाही. तसेच पुरेसे मानधन व जीविताची हमी या बाबींचीसुद्धा पूर्तता नाही. यामुळे आशा सेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आह. याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.शहरी वा ग्रामीण भाग असो अगदी अगदी गल्लोगल्ली पिंजून काढून कुष्ठरोगपासून हत्तीरोगापर्यंत तसेच टीबीपासून आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थी च्या सर्वेक्षणा पर्यंतची कामे आशा वर्कर व प्रवर्तक काकडून करून घेतली जातात या कामाच्या बोजामुळे आशा वर्कर आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे .आशा वरकसँनी एकत्रितपणे एकाच वेळी किती कामे करावीत याचा विचारच शासकीय स्तरावर होताना दिसत नसल्याची खंत आशा सेविकांनी व्यक्त केली आहे.आरोग्यविषयक सर्व कामे शहर व ग्राम पातळीवर आशा वर्कर्सकडून करून घेतली जातात. ही कामे करीत असताना आशावर्कर्सच्या आरोग्यविषयक बाबींकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबियांचे प्राथमिक तपासणी करून माहिती घेण्याचे काम आशा वर्कर्स करीत आहे. परंतु त्यांना आरोग्यविषयक सुरक्षा नाही.गेल्या १२ वर्षांपासून राज्यात सुमारे साठ आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कामानुसार मोबदल्यावर काम करीत आहेत. कोरोनाचे काम करताना शासनाने त्यांच्या सुरक्षितेची हमी घ्यावी. सप्टेंबर २०१९ पासून जाहीर केलेली मानधनवाढ फरकासह तत्काळ द्यावी. आशा व गटप्रवर्तक तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पुरवित असल्याने त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते लागू करावेत, अशी मागणी विविध आंदोलनांद्वारे करत पाठपुरावा शासनाकडे करीत आहोत.- रामकृष्ण बी.पाटील, राज्य कार्याध्यक्ष, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना

टॅग्स :Healthआरोग्यBhusawalभुसावळ