शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम वाया गेल्याने संपूर्ण विमा भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

पातोंडा ता.अमळनेर पातोंडासह परिसरात गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे; पण गेल्या अडीच महिन्याच्या ...

पातोंडा ता.अमळनेर

पातोंडासह परिसरात गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे; पण गेल्या अडीच महिन्याच्या पावसाच्या ओढीने संपूर्ण खरिपाचा हंगाम वाया गेल्याने बळीराजाची पूर्णतः आर्थिक घडी विस्कटली.

जून, जुलै व अर्धा आगस्टपर्यंत पावसाने ओढ दिली. जवळजवळ अडीच महिना पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतीवरच जीवनमान अवलंबून असलेल्या बळीराजाची पूर्णतः शेती उत्पादनाची व आर्थिक प्रपंचाची घडी संपूर्ण विस्कटली. असा हा बळीराजा भीषण दुष्काळी परिस्थितीच्या संकटात सापडला आहे, तरी शासनाने या गंभीर परिस्थितीची तत्काळ दखल घेऊन हेक्टरीभरीव अशी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली; पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली. पेरणी करून एक महिना उलटला तरी उगवण पिकांवर पाऊस न झाल्याने पिके जळू लागली. खरीप हंगाम शंभर टक्के वाया जाणारच, म्हणून शेतकरी हताश झाला. महागडी कापूस, मूग, तूर आदी बियाणे पेरणी करून आर्थिक फटका बसला. जूनमध्ये एकदा, जुलैपण एकच असा फक्त साठ-सत्तर मिमी इतकाच पाऊस परिसरात झाला.

पावसाळा अगदी उन्हाळ्यासारखा

अर्धा आगस्ट महिना कोरडा गेला. भरपावसाचा ऋतु हा उन्हाळ्यासारखा जात आहे. बळीराजा हवालदिल झाला. पिके अजून जमिनीच्या कुशीतच आहेत. पावसाअभावी वाढ खुंटली आहे. वरून उन्हाचा तडाखा यामुळे पिके जळू लागली. पूर्ण खरीप हंगाम वाया गेला. आता पाऊस पडला समाधान झाले; पण खरिपाचा हंगाम वाया जाणार, हे संकट कायम राहील. दोन दिवस पाऊस पडला. आता पुन्हा पावसाने उघडीप दिली. कोमात गेलेल्या कापूस पिकाला जेमतेम जीवनदान मिळाले; पण मूग,उडीद, तीळ आदी पिके तर वाया गेलेली आहेत. आता पुढील सप्टेंबरमध्येही पाऊस नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विमा भरपाई मिळावी

पातोंडासह परिसरातील सावखेडा, मुंगसे, रुंधाटी, मठगव्हाण, दापोरी, दहीवद,

सोनखडी, नगाव-गडखांब परिसर, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव-जळोद परिसर या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमाधारकांना सपूर्ण विमा भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे वरील दुष्काळी गावातील सरपंच, उपसरपंच ,सदस्य,सामाजिक कार्यकर्ते,यांनी दुष्काळी परिस्थितीची समस्या सांगून लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव अशी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन शासनाकडे प्रस्ताव मांडून बळीराजासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.