शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने भारताचा कापूस घेण्यास दिला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कापसाची आवक आता पूर्णपणे थांबली असून, खासगी सह सर्वच सहकारी जिनिंगदेखील आता बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील कापसाची आवक आता पूर्णपणे थांबली असून, खासगी सह सर्वच सहकारी जिनिंगदेखील आता बंद झाल्या आहेत. यावर्षी भारताकडून मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात झाल्याने, फेब्रुवारीनंतर कापसाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली होती. दरम्यान, पाकिस्तानकडूनदेखील भारताचा माल मिळावा यासाठी प्रस्ताव आला होता, मात्र पाकिस्तान संसदेने पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांचा प्रस्ताव नामंजूर केला असल्याने. भारताची निर्यात काही प्रमाणात वाढू शकणार होती त्यावर ठराविक परिणाम झालेला आहे.

दरवर्षी भारताकडून चाळीस लाख गाठींची निर्यात व्हिएतनाम , बांगलादेश, नेपाळ, चीन या देशांमध्ये केली जाते. मात्र यावर्षी इतर देशांच्या तुलनेत भारताच्या कापसाची गुणवत्ता चांगली होती. त्यातच ब्राझील व अमेरिकेच्या कापसाच्या तुलनेत भारताच्या मालाची किंमतदेखील कमी होती. यामुळे यंदा भारताच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी होती. याचाच परिणाम म्हणून यंदा भारताकडून ६६ लाख गाठींची निर्यात झाली असून, ही निर्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कापसाला मागणी वाढल्याने, पाकिस्तानमधील कॉटन मिल्स, टेक्स्टाइल मिल्समधील व्यापाऱ्यांकडून भारताचा व्यापाऱ्यांशी संपर्क साधून भारताचा माल मिळावा यासाठी मागणी करण्यात आली होती. यासाठी पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांकडून भारताचा मालाला पाकिस्तानात आयात करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पाकिस्तान संसदेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र पाकिस्तानमधील संसदेने व्यापाऱ्यांचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. यामुळे भारताचा निर्यातीवर कोणताही परिणाम झाला नसता तरी, पाकिस्तानने मंजुरी दिली असती तर भारताचा दहा लाख गाठींची निर्यात वाढली असती. तसेच पाकिस्तान सरकारने नामंजूर केलेल्या प्रस्तावामुळे खंडीच्या दरात काही परिणाम झाला असून, खंडीचे दर एक हजार रुपयांनी घसरले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खंडीचे दर ४६ हजार रुपये इतके आहेत.

खान्देशातून यंदा १५ लाख क्विंटल गाठींची खरेदी

खान्देश जिनिंग असोसिएशनचे संचालक प्रदीप जैन यांनी सांगितले की, दरवर्षी खान्देशात सरासरी १५ लाख गाठींची खरेदी होत असते. यंदा खरेदीत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात ३० टक्क्यांची घट झाली असून, यंदा १८ लाख गाठींची खरेदी होण्याची शक्यता होती. मात्र अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती प्रदीप जैन यांनी दिली.

- खान्देशात सुमारे ८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते.

- यंदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात कापसाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे उत्पादनातदेखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

- यंदा कापसाचे लागवड क्षेत्र पाहता १८ लाख गाठींपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता होती. मात्र, पावसामुळे १५ लाख गाठींपर्यंत यंदाचे उत्पादन झाले आहे.

कोट..

यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. दरम्यान पुढील वर्षी लागवडीत वाढ होण्याची शक्यता असून, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी पाहता शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी प्रमाणात चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

-प्रदीप जैन, संचालक, खान्देश जिनिंग असोसिएशन

पाकिस्तानमधून जरी भारताचा माल घेण्यास नकार दिला असला, तरी भारताचा निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नाही. यंदा काही वर्षांच्या तुलनेत भारतातील निर्यात वाढली आहे. तसेच पुढील वर्षीदेखील हीच परिस्थिती कायम राहिल्यास कापसाला चांगले दिवस येऊ शकतात.

- हर्षल नारखेडे, कॉटन बाजारातील जाणकार