शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मेहरुण तलावावर विदेशी पक्ष्यांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदा सर्वदुर असलेली पाण्याची मुबलकता, तलाव व धरणांमध्ये खोलगट करण्यात आलेला भाग यामुळे यंदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदा सर्वदुर असलेली पाण्याची मुबलकता, तलाव व धरणांमध्ये खोलगट करण्यात आलेला भाग यामुळे यंदा मेहरुण तलाव परिसरात विदेशी पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे. निसर्ग मित्र संस्थेतर्फे रविवारी मेहरूण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जानेवारी महिन्यात नेहमी देशी-विदेशी पक्ष्यांच्या चिवचिवाटामुळे गजबजणारा तलाव यंदा शांत असल्याचे आढळून आले. काही स्थानिक व विदेशी पक्ष्यांनी तलाव परिसरात हजेरी लावली असली तरी अनेक पक्ष्यांनी यंदा मेहरूण तलाव परिसराकडे पाठ फिरविल्याचेच दिसून येत आहे.

निसर्गमित्र संस्थेतर्फे रविवारी मेहरुण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संस्थेचे प्रमुख राजेंद्र गाडगीळ, शिल्पा गाडगीळ यांच्यासह उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, डॉ.अक्षता महा, कनिष्का कुलकर्णी, लावण्या कुलकर्णी यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणात सहभाग घेतला. पक्षीनिरीक्षणादरम्यान एकूण ४७ प्रकारच्या प्रजाती आढळून आल्या. यामध्ये वॉटर बर्ड, पांढरा पक्षी , चार प्रजातीचे बदक, तुतारी, चिखल्या, शेकाटे, बगडे, पानकावळे, पान कोंबड्या, हीरॉन,पॉन हीरॉन सैबेरीया श्वेत कंठी युरोप, आशियाई तपकीरी माशीमार, पिवळा धोबी उत्तरेकडून वारकरी बदक, हळदी-कुंकु बदक या पक्ष्यांचा समावेश आहे.

पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे कारण

यंदा सर्वदुर पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याचा शोधात महाराष्ट्रापर्यंत येणारे पक्षी मध्यप्रदेश, राजस्थान या भागातच थांबले आहेत. यासह मेहरूण तलाव परिसरात गाळ काढताना, काही टेकळ्या देखील काढण्यात आल्या. यामुळे पक्ष्यांना लागणारी पाणथळ जागा मेहरूण तलावात कमी झाली आहे. खोल पाण्यात पक्ष्यांना अन्न मिळत नाही. तसेच पक्षी या पाण्यात उभे सुध्दा राहू शकत नाहीत. मनपाकडून गाळ काढताना चुकीची पध्दत वापरल्याने पक्ष्यांनी मेहरूण तलावाकडे पाठ फिरवल्याचे पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले.

फेब्रुवारीत पक्ष्यांची वाढू शकते संख्या

मेहरूण तलाव परिसरात साधारणपणे डिसेंबर महिन्यापासून विदेशी पक्ष्यांचे आगमण होत असते. मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यानंतर या पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरु होत असतो. दरम्यान, जानेवारी महिन्यात जरी पक्ष्यांनी पाठ फिरवली असली तरी मात्र फेब्रुवारी महिन्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण, तलाव परिसरातील पाणी कमी होईल त्यामुळे पाणथळ जागा तयार होईल, यामुळे पक्ष्यांना मुबलक अन्न उपलब्ध होईल.