शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

मांडवेदिगरवासीयांना दोन हजार एकर जमीन खाली करण्याच्या मिळाल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 9:01 PM

भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये उडाली खळबळधसका घेतल्याने दोघांचा मृत्यू : प्रशासन अनभिज्ञ

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासकीय अधिकारी मात्र अद्यापही अनभिज्ञ आहे.मांडवेदिगर, भिलमळी व मुसाळतांडा अशी बंजारा व भिल्ल समाजाची तीन गावांची एक किलोमीटर अंतरात वस्ती आहे. तिन्ही तांड्यांची लोकसंख्या जवळपास पाच हजारावर पोहोचली आहे. गेल्या दीडशे वर्षांपूर्वीची ही वस्ती असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दीडशे वर्षांपासून हा समाज या परिसरातील शेतीवर अवलंबून आहे. बहुतांशी जमीन ही शेतकऱ्यांनी विकत घेतली. त्याचा खरेदी-विक्रीचा टॅक्स व शेतसाराही ग्रामस्थ दीडशे वर्षांपासून भरत आहे. त्यांच्याकडे खरेदी खत आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाने शासनाने गेल्या काही दिवसांपासून ही जमीन शासन जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी ग्रामस्थांना नुकतीच जमीन व गावातील घरे खाली करण्यासंदर्भात नोटिसा दिल्या आहे.पालकमंत्र्यांकडूनही ग्रामस्थ आले आहे खाली हातग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांच्याकडेही न्यायासाठी प्रयत्न केले. मात्र हा प्रश्न न्यायालयीन व न्यायप्रविष्ट असल्यामुळे ग्रामस्थांना येथूनही खाली हात यावे लागले, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागावाल असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उपस्थित झाला आहे?दरम्यान, ३ रोजी सुमारे शंभर लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जळगाव येथे धाव घेतली होती. मात्र जिल्हाधिकाºयांची भेट झाली नसल्यामुळे ग्रामस्थ परत आले आहे. त्यात दुसºयाच दिवशी धसक्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.प्रांताधिकाºयांनी सांगितले अपील दाखल कराप्रांताधिकारी चिंचकर यांनी या जमिनी शासन जमा करण्याची प्रक्रिया केल्यानंतर जिल्हाधिकाºयांकडे अपील करा, अशी सूचना केली आहे. अपील करण्यास गावकºयांना तब्बल १५ ते २० लाख रुपये खर्च येणार आहे. अगोदरच गोरगरीब व भटका-विमुक्त समाज एवढा खर्च करणार कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात शासनाने ही कारवाई केल्यामुळे ग्रामस्थांनी जावे कुठे व राहावे कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे .दोघांच्या मृत्यूनंतर गाव झाले भयभीतशासन तब्बल दोन हजार एकर जमीन ताब्यात घेणार असल्यामुळे तिन्ही गावे संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. याचा धसका घेऊन रविवारी सोदरीबाई मोरसिंग पवार (वय ५५) यांचा पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर ग्रामस्थ गावात येत नाही, तोपर्यंत अजमल सदू पवार (वय ३०) यांचाही मृत्यू झाला. पवार यांचा मुलगा त्यांना घर खाली करण्यासंदर्भात आलेली नोटीस वाचून दाखवत असताना पवार खाली कोसळले व त्याचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अजमल पवार यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.जमीन खाली करण्यासंदर्भात हायकोटार्चा निकाल -प्रांताधिकारी चिंचकरमांडवेदिगर येथील जमीन ही देवस्थानाची आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल होती. यावेळी कोर्टाने ही जमीन खाली करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाप्रमाणे ही जमीन खाली करण्यासंदर्भात मी नोटीस दिली आहे. त्याचप्रमाणे मी संबंधितांना जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल करण्याचेही त्यांनी सुचवले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ