शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

म्हसाळा धरणातून पाण्याची सर्रास चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 00:26 IST

धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर : पाणी टंचाईचे सावट, कारवाईची मागणी

कुºहाड ता.पाचोरा : कोकडी  शिवारातील म्हसाळा धरण सध्या दुर्लक्षित आहे. या धरणाची दुर्दशा वाढतच  आहे.  यंदा १०० टक्के भरलेले  धरण हे चुकीच्या नियोजनामुळे तसेच प्रचंड पाणी चोरीमुळे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागले आहे. सध्या या धरणात मृतसाठा वगळता आता केवळ १० टक्के जलसाठा असून ३५-४० वीज पंप लावून पाणी चोरी सर्रासपणे केली जात आहे. याचा परिणाम प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.  कुºहाड येथे ८-१० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जर हे धरणातील वीज पंप जप्त केले नाही तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणारा आहे. याकडे अधिकाºयांनी वेळीच लक्ष दिले नाही तर  नागरिकांसाठी तसेच गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.धरण भिंतीवर काटेरी झुडुपेया धरणाच्या भिंतीवर झाडांचे अतिक्रमण झाले असून याच्या मुळ्या धरणाच्या भिंतीत खोलवर गेल्या आहेत. यामुळे या भिंतीला कधीही तडा पडू शकतो.  या धरणाचे काम १९७२ मध्ये झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता धरणाच्या दुरुस्तीसाठी काही शेतकºयांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दोन वर्षापासून पाठपुरावाही केला आहे. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पाटचारी स्वच्छता स्वखर्चानेगावातील शेतकरी व धरणाचा  गेटमन रतन संपत माळी याने गतवर्षी उन्हळ्यात ४० हजार रु. खर्चून धरणापासून १ कि.मी.पावेतो पाटचारीचा गाळ जेसीबीने काढला होता,  परंतु त्याचा मोबदला या शेतकºयाला शासनाकडून मिळालेला नाही. बºयाचशा पाटचारीमधील गाळासह दुरुस्ती, पाईप लिकेज अजूनही बाकी आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची  गरज आहे. या धरणावर पाण्याची नवीन विहीर खोदून लवकरात लवकर गावाला ३-४ दिवसाआड  पाणी देऊ तसेच या विहिरीवर  स्वतंत्र डीपी बसवून देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)यंदा पावसाळयात १०० टक्के भरेलल्ल्या या धरणात सध्या केवळ  १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणावरुन ७०० एकर शेती क्षेत्र कालवा प्रवाहासाठी आहे. यंदा हे पाणी दिवाळीनंतर दोन महिन्यांनी पाटचारीने सोडले असता बरेचसे पाणी चाºयांद्वारे  गळती होऊन  वाया गेले. शेतºयांनी या धरणाच्या पाण्यावर पिकांची लागवड केली परंतु पाणीसाठा संपल्याने ही पिके सुकू लागली आहेत. या धरणाहून कळमसरा, कोकडीतांडा, कुºहा खु।। बु।।, अंबेवडगाव, जोगे अशा गावांना पाणीपुरवठा होतो.  परंतु पाटबंधारे  अधिकाºयांचे दुर्लक्षामुळे जलसाठा हा आरक्षणापेक्षाही एक फूट खाली आहे.  या धरणाची करवसुली प्रत्येक वर्षी १,३०,०००  रु. अशी आहे. एवढा शेती पाण्याचा सारा मिळूनही या धरणाकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्याने हे धरण अखेरची घटका मोजत आहे.