शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवु शकते मानसिक स्वास्थ्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST

डमी नंबर : ११३८ आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : क्वारंटाईन किंवा आयसोलेशन हे प्रकार संपूर्ण जगासमोर ...

डमी नंबर : ११३८

आकाश नेवे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : क्वारंटाईन किंवा आयसोलेशन हे प्रकार संपूर्ण जगासमोर १९९८ नंतर पहिल्यांदाच आले आहेत. पूर्वीच्या काळी प्लेगच्या साथीमध्ये नागरिकांना याचा सामना करावा लागत होता. आता प्रथमच सर्वांना याचा सामना करावा लागला. कोविड काळात सामाजिक जीवनदेखील बंद झाले. त्यामुळे घरातच ऑनलाइनच्या माध्यमातून का होईना, पण प्रत्येकाने आपला एक सुखी कोपरा शोधला होता. आता पुन्हा एकदा हळूहळू सामाजिक जीवनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे अनेकांना चिडचिड होणे, तणाव, नैराश्य यांचा सामना करावा लागत आहे. त्यात संवाद साधणे आणि नियमित कर्तव्यपूर्ती करणे हे उत्तम उपाय असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत.

सध्या काळात घरात बंद असताना सर्वांनाच सायबरचा आधार मिळाला. प्रत्यक्ष जीवन बंद झाले आणि व्हर्च्युअल जीवन सुरू झाले. व्यक्तींचा संबंध फारसा राहिला नाही. त्यामुळे विलगीकरणातील आयुष्याचीच सर्वांना सवय झाली. काम करतानादेखील घरात सोयीने काम करण्यावर भर वाढला. हीच सवय नागरिकांमध्ये वाढली; मात्र आता सामाजिक जीवन पुन्हा सुरू झाल्यावर हा साचा बदलला, त्यामुळे अनेकांमध्ये चीडचीड वाढली आहे. ज्यांनी या काळात फारसा संवाद साधला नाही. त्यांच्यासमोर अशा समस्या वाढल्या आहेत. ही समस्या मुलांमध्ये जास्त आहे. मोठ्यांमध्ये आर्थिक नुकसानामुळे मानसिकदृष्ट्या खचल्याच्या केसेस जास्त असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोट - सध्याच्या काळात चिडचिड, ताणतणाव अशा समस्या आहेत. आधी सर्वांनाच बाहेर जावे लागत होते; मात्र अचानक हे बाहेर जाणे बंद झाले आणि आता पुन्हा बाहेर जावे लागते. त्यामुळे व्यक्तींचा संबंध येतो आणि तणाव निर्माण होते. हा तणाव वाढू नये, यासाठी बदलत्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे, व्यायाम करणे, कामाच्या वेळा निश्चित करणे, असे उपाय करावे. जास्त अडचण असेल तर समुपदेशन महत्त्वाचे ठरते. - नीरज देव, मानसोपचार तज्ज्ञ.

काय आहेत उपाय

- बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे

- मानसिक क्षती दूर करावी, उठायची वेळ निश्चीत करा

- व्यायाम करा, नेहमीची कामे करायची आहे, ही कर्तव्यभावना ठेवावी

- चिंता, उदासिनता, हताशता असेल तर समुपदेशन करावे

- नव्या वेगाने जीवनात प्रवेश करावा