शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मंत्रिपदासाठी बंडखोरांमध्ये जोरदार रस्सीखेच! कोणाची वर्णी लागणार? 'या' नेत्यांची नावं आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:47 IST

Jalgaon Politics : जळगावच्या तब्बल पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला नव्या सरकारमध्ये किती मंत्रिपदे मिळणार? याची उत्सुकता आहे.

प्रशांत भदाणे

जळगाव - राज्यात ठाकरे सरकार कोसळलं. आता एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि भाजपचं नवं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीही झाला. त्यानंतर आता शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली. मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार? याचेही अंदाज लावले जाताहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडात खरा जोर लावला, तो जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी. जळगावच्या तब्बल पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला नव्या सरकारमध्ये किती मंत्रिपदे मिळणार? याची उत्सुकता आहे.

शिंदे सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे हमखास येतील, अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेहरबानी दाखवलीच, तर एक राज्यमंत्रिपदही जळगावच्या पदरात वाढून मिळू शकते. भाजपचे नेते गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद जवळपास निश्चित मानलं जातं आहे. जिल्ह्यात एकाचवेळी तीन मंत्रिपदे राहण्याचीही शक्यता आहे. युती सरकारमध्ये गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे होती तर गुलाबराव पाटलांकडे राज्यमंत्रिपद होतं. हाच फॉर्म्युला आताही कायम असण्याची शक्यता आहे.

राज्यमंत्री पदासाठी शिवसेनेत मोठी रस्सीखेच आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांच्यासह पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील व मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात तगडी फाईट असेल. चिमणराव पाटील हे सेनेचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी तीनवेळा शिवसेनेचे विधानसभेत नेतृत्व केलंय. जिल्ह्यात मराठा समाजाचा एकही मंत्री नसल्याने त्यांना संधी मिळू शकते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची संधी गुलाबराव पाटलांनी हिरावून घेतली होती. त्यामुळं आता त्यांच्या नावाचा विचार होईल, असं सांगितलं जातंय. आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळं त्यांचंही पारडं जड आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेत गेले असले तरी खडसेंना शह देण्यासाठी त्यांना संधी मिळू शकते. पण ही शक्यता खूपच कमी आहे.

नव्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे असेल, याचीही चर्चा आहे. भाजपच्या काळात हे पद गिरीश महाजनांकडं होतं. तर ठाकरे सरकारमध्ये गुलाबराव पाटलांकडे पालकमंत्री पद होतं. आगामी काही महिन्यात नाशिक महापालिकेच्या निवडणुका असल्याने, गिरीश महाजन यांच्यावर नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. असं झालं तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचं पालकमंत्रीपद कायम राहू शकते. मात्र गिरीश महाजन नाशिकसह जळगावसाठी देखील आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे सरकारचा पूर्ण होल्ड भाजपकडे असल्याची चर्चा असल्याने जळगावचं पालकमंत्री पद भाजप सोडेल का? हा प्रश्न आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळJalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेGulabrao Patilगुलाबराव पाटीलKishor Patilकिशोर पाटील