शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

मंत्रिपदासाठी बंडखोरांमध्ये जोरदार रस्सीखेच! कोणाची वर्णी लागणार? 'या' नेत्यांची नावं आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:47 IST

Jalgaon Politics : जळगावच्या तब्बल पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला नव्या सरकारमध्ये किती मंत्रिपदे मिळणार? याची उत्सुकता आहे.

प्रशांत भदाणे

जळगाव - राज्यात ठाकरे सरकार कोसळलं. आता एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि भाजपचं नवं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीही झाला. त्यानंतर आता शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली. मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार? याचेही अंदाज लावले जाताहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडात खरा जोर लावला, तो जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी. जळगावच्या तब्बल पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला नव्या सरकारमध्ये किती मंत्रिपदे मिळणार? याची उत्सुकता आहे.

शिंदे सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे हमखास येतील, अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेहरबानी दाखवलीच, तर एक राज्यमंत्रिपदही जळगावच्या पदरात वाढून मिळू शकते. भाजपचे नेते गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद जवळपास निश्चित मानलं जातं आहे. जिल्ह्यात एकाचवेळी तीन मंत्रिपदे राहण्याचीही शक्यता आहे. युती सरकारमध्ये गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे होती तर गुलाबराव पाटलांकडे राज्यमंत्रिपद होतं. हाच फॉर्म्युला आताही कायम असण्याची शक्यता आहे.

राज्यमंत्री पदासाठी शिवसेनेत मोठी रस्सीखेच आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांच्यासह पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील व मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात तगडी फाईट असेल. चिमणराव पाटील हे सेनेचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी तीनवेळा शिवसेनेचे विधानसभेत नेतृत्व केलंय. जिल्ह्यात मराठा समाजाचा एकही मंत्री नसल्याने त्यांना संधी मिळू शकते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची संधी गुलाबराव पाटलांनी हिरावून घेतली होती. त्यामुळं आता त्यांच्या नावाचा विचार होईल, असं सांगितलं जातंय. आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळं त्यांचंही पारडं जड आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेत गेले असले तरी खडसेंना शह देण्यासाठी त्यांना संधी मिळू शकते. पण ही शक्यता खूपच कमी आहे.

नव्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे असेल, याचीही चर्चा आहे. भाजपच्या काळात हे पद गिरीश महाजनांकडं होतं. तर ठाकरे सरकारमध्ये गुलाबराव पाटलांकडे पालकमंत्री पद होतं. आगामी काही महिन्यात नाशिक महापालिकेच्या निवडणुका असल्याने, गिरीश महाजन यांच्यावर नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. असं झालं तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचं पालकमंत्रीपद कायम राहू शकते. मात्र गिरीश महाजन नाशिकसह जळगावसाठी देखील आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे सरकारचा पूर्ण होल्ड भाजपकडे असल्याची चर्चा असल्याने जळगावचं पालकमंत्री पद भाजप सोडेल का? हा प्रश्न आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळJalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेGulabrao Patilगुलाबराव पाटीलKishor Patilकिशोर पाटील