शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

जळगाव जिल्ह्यात धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:56 PM

जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारक

जळगाव : जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रत्येक धरणात शिल्लक साठा व त्याचे नियोजन करीत पाणी सोडावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.गिरणा धरणात २६ सप्टेंबर रोजी ८८८८ दलघफु पाणीसाठा होता. त्यापैकी ७२१४ दलघफु अर्थात ९५ टक्के पाणी आरक्षित केले आहे. मन्याड धरणात जिवंत साठा नसल्याने मृतसाठ्यावर आरक्षण दिले आहे. २७८.९७ दलघफु असलेला १८ टक्के साठा आरक्षित केला आहे. सोबतच बोरी ४६८.६४ दलघफु, हतनूर धरणात ९००५.३३ दलघफु पाणी साठा आहे. त्यापैकी औद्योगिक साठी १५८८.७६ दलघफू, सावादा, भुसावळ, रावेर, यावल, धरणगाव, अमळनेर, चोपडा या नगर परिषदसाठी २१२३.६२ दलघफू आरक्षित, ग्रामीणसाठी ३९८.५० असा एकूण ४११०.८८ दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. वाघूर धरणात ४१९१.३५ दलघफु पाणी साठा आहे. या पैकी १५९२.२५ दलघफू पाणीसाठा आरक्षित केला आहे. गुळ धरणात ६९३.१३ दलघफू पैकी ५२३.३५ दलघफू, बहुळा धरणात पाणी नाही. त्यावर पाचोरा नगर परिषदसह १७ गावे अवलंबून आहे. हिवरा धरणात ११६.८९ दलघफूपैकी १३.२४ दलघफू, तोंडापूर धरणात ८.४८ दलघफूपैकी ५.९३, अग्नावती धरणात ६६.७५ दलघफूपैकी ७.९४ दलघफू, सुकी धरणात १४०७.३० दलघफूपैकी ४५.१६ दलघफू, अंजनी धरणात ८२.०३ दलघफूपैकी ३७.५० दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे भोकरबारी धरणात मात्र पाणीसाठाच नाही.प्रत्येक महिन्याच्या शेवटी धरणात किती साठा शिल्लक आहे त्याचे नियोजन करावे व त्यानुसार पाणी सोडावे अशा सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारकजिल्ह्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती असून १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. भविष्यातील टंचाई लक्षात प्रकल्प व धरणातील पाणी सोडण्यापूर्वी जिल्हाधिकाºयांची परवानगी बंधनकारक असून कुठल्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी सिंचनासाठी देता येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव