शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

विसंवादी सूर विकास कामांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:49 IST

प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील वादाच्या दुष्परिणामाचा इतिहास, निवडणुका लांब असताना विकासासाठी एक सूर का नाही?, वचनापासून लांब पळणाºया नेत्यांनी गमावला जनतेचा विश्वास

मिलिंद कुलकर्णीप्रगती आणि विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रथाच्या दोन चाकांमध्ये संवाद, समन्वय राहिला तरच गाडा सुरळीत चालतो. विसंवाद, संशय अशा बाबी आल्या तर मात्र ही स्थिती विकास कार्याला मारक ठरते. एकमेकांची उणीदुणी काढणे, आरोप प्रत्यारोप करणे यात शक्ती खर्च होते. हे कळत असूनही वळत नसल्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.जळगावात सत्ताबदल करताना नागरिकांनी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. ‘एक वर्षांत जळगावचा चेहरामोहरा बदलून दाखवेल, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मते मागायला येणार नाही’ असा निर्धार, निश्चय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यातील धडाडी, संकटमोचक अशी प्रतिमा पाहून जळगाव आणि पुढे धुळेकरांनी भाजपला बहुमत दिले. जळगावात तर आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर झाला. एका कुटुंबात आमदार आणि महापौरपद आल्याने जळगावच्या विकासाचा रथ चौखूर उधळेल अशी अपेक्षा होती. पण दीड वर्षांत ती अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे या महापौर झाल्या. उपमहापौरपदाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कैलास सोनवणे यांनी स्थायी समितीचे सभापती म्हणून अतुलनीय कार्य वर्षभरात केले होते. त्यांच्या स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेमार्फत राष्टÑीय आणि स्थानिक विषयांविषयी अभियान, चळवळी आयोजित करतात. स्वाभाविकपणे सोनवणे दाम्पत्याकडून जळगावकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थात त्यांच्यापुढे प्रश्नांची मालिकादेखील मोठी आहे. अमृत पाणी योजना, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, महामार्ग चौपदरीकरण, वॉटरग्रेस कंपनीकडील स्वच्छतेचे कंत्राट, शिवाजीनगर, असोदा व भोईटे नगर उड्डाणपूल असे अनेक विषय नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यापैकी केवळ स्वच्छतेच्या प्रश्नावरुन वादळ निर्माण झाले. प्रशासकीय अधिकाºयाविषयी तक्रार असेल तर महासभेत पुराव्यानिशी भंडाफोड करता येईल. आयुक्त किंवा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रार करता येईल. परंतु, अश्लिल शिवीगाळ, मारहाणीची धमकी देणे हे चुकीचे आहे. यातून प्रशासनाचे मनोबल खच्ची होईल. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेचे नेतृत्व स्विकारले असताना या प्रश्नी ते उघडपणे समोर का येत नाही, हा प्रश्न आहे. परवा, भाजप नगरसेवकांची गुप्त बैठक घेऊन वॉटरग्रेसचा ठेका रद्द करा, अशी सूचना त्यांनी दिली, असे सांगितले जाते. पण खरेच असे आहे की, पक्षांतर्गत सुंदोपसुुंदी शांत करण्यासाठी ही बैठक झाली, हे कळायला मार्ग नाही.गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, खासदार उन्मेष पाटील, महापौर भारती सोनवणे यांनी समन्वयाने काम केले तर शहराचा चेहरामोहरा बदलेल.एक वर्षांत जळगावचा विकास करुन दाखवेन या गिरीश महाजन यांच्या घोषणेचे काय झाले? महापालिकेत सावळागोंधळ सुरु असताना ते गप्प का? गुप्त बैठका घेऊन नगरसेवकांना ते काय संदेश देत आहेत, हे स्पष्ट व्हायला हवे.अधिकाºयाला शिवीगाळ, धमकी देण्याचेसमर्थन होऊच शकत नाही. महापौरांचे पती कैलास सोनवणे यांच्याविरुध्द अशा आशयाचा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेतील सत्ता ताब्यात असताना गैरव्यवहारात कोणीही अधिकारी सहभागी असेल तर पुराव्यासह ते जाहीर करा. महासभेत जाब विचारा. राज्य शासनाकडे तक्रार करायला हवी. असा विसंवाद हा विकास कामांसाठी मारक ठरतो.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव