शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकवेळी भावनांचा उद्रेक कसा थांबवायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

मराठा आरक्षण निकाल : पोलीस दलाच्या बैठकीत समाजातील मान्यवरांचा सवाल जळगाव : मराठा समाजाने प्रत्येक वेळी सामाजिक भान ठेवून ...

मराठा आरक्षण निकाल : पोलीस दलाच्या बैठकीत समाजातील मान्यवरांचा सवाल

जळगाव : मराठा समाजाने प्रत्येक वेळी सामाजिक भान ठेवून मोर्चे काढले, आंदोलने केली. प्रत्येक वेळी भावनांचा उद्रेक थांबवलेला आहे आहे. गायकवाड आयोगाला गावोगावी जाऊन वस्तुस्थिती दाखविली, असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या काळात हा निकाल देऊन नेमके काय साधले, असाही सवाल मराठा समाजातील मान्यवरांनी पोलीस दलाच्या बैठकीत उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक घेतली. त्या बैठकीत प्रत्येकाने आपले मत मांडले.

प्रा. डी. डी. बच्छाव यांनी सांगितले की, गायकवाड समिती जळगाव जिल्ह्यात आली तेव्हा आपण स्वतः चाळीसगाव चोपडा, पाचोरा या भागात फिरलो. कोरडवाहू व बागायती शेती व शेतकऱ्यांचे घर त्यांना दाखविले. वस्तुस्थिती समजल्यानंतर आयोगाने अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला, असे असताना असा निकाल येणे अत्यंत दुःख व वेदनादायी आहे.

डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे पोलिस व सरकारी यंत्रणेवर मोठा ताण आहे, असे असताना याच काळात मराठा आरक्षणाचा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय साधले आहे याचे आश्चर्य वाटते. हा निकाल सहा महिने उशिरा नाही देता आला असता.

विनोद देशमुख यांनी प्रत्येक वेळी मराठा समाजच समजूतदाराची भूमिका घेतो. या निकालामुळे जगायचे की समजूतदारपणा दाखवायचा हेच कळत नाही. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे, त्यामुळे हे प्रकार आधी थांबवावे. त्यांनी राजकीय पोळी भाजून घेऊ नये.

कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवा : पोलीस अधीक्षक

या बैठकीत मराठा समाजातील मान्यवरांची मते जाणून घेतल्यानंतर पोलीस अध्यक्ष डॉ. प्रवीण मुंढे यांनी आपल्या प्रत्येकाच्या भावना राज्यशासनाकडे कळवल्या जातील. या निकालामुळे कुठेही कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागू नये. तरुण पिढी भावनेच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलू शकते, त्यासाठी आपणच पुढाकार घेऊन चांगले काय, वाईट काय, याची जाणीव करून द्यावी. शेवटी पोलीस दलाला कायदा राबवावा लागतो असे मत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले.

या बैठकीला संजय पवार, रवी देशमुख, हेमंत साळुंके, सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, ॲड.सचिन पाटील, दीपक सूर्यवंशी, प्रमोद पाटील, किरण बच्छाव, हिरेश कदम यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा व सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

आज समाजाची बैठक

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सात वाजता नूतन मराठा महाविद्यालयात समाजातील सर्वपक्षीय मान्यवरांची बैठक बोलावण्यात आली आहे. या निकालात राज्य शासनाने तोडगा काढावा व पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावे, असे मत मांडण्यात आले.