शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल महाविकास आघाडी सरकार उघड करणार - गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:12 IST

नारायण राणे यांना टीकेशिवाय काय येते?

जळगाव : येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल महाविकास आघाडी सरकार उघड करणार असल्याच्या वृत्ताला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात दुजोरा दिला असून ‘मागील काळात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्या उघड होतीलच’, अशा शब्दात त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपला घेरण्यासाठी आखल्या जाणाऱ्या रणनितीचे संकेत दिले.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौºयाच्या पार्श्वभूमीवर नाणार प्रकल्पावरून त्यांच्यावर टीका करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही पाटील यांनी समाचार घेत राणे यांना टीका करण्याशिवाय काय येते व टीकेशिवाय त्यांचे अस्तित्व कसे टिकू शकेल, असा चिमटाही त्यांनी राणे यांना काढला.शिवजयंती निमित्त जळगावात बुधवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीला हजेरी लावल्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी हे संकेत दिले.येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल उघड करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, ‘मागील काळात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्या उघड होतीलच. त्यात कुणी भीती बाळगण्याचे कारण नाही. जे चांगले असेल ते चांगलेच असेल. मात्र जे उघड करण्यासारखे असेल ते उघड करावेच लागेल. ज्या गोष्टी खºया आहेत, त्या जनतेसमोर आणाव्याच लागतात, असे स्पष्टपणे सांगितले.टीका केली नाही तर राणेंचे अस्तित्व कसे टिकेल?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौºयावर आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘नाणार’ प्रकल्पाबाबत वक्तव्य करीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे कोकणच्या विकासात काय योगदान आहे? असा प्रश्न नारायण राणे यांनी केला होता. तसेच हे राज्य अधोगतीकडे जात आहे, सरकार चालत नसून भ्रष्टाचाराची दुकाने सुरु आहेत आणि यात मुख्यमंत्री कार्यालयाचाही समावेश आहे, अशीही टीका राणे यांनी केली होती. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत टीका करणे हेच नारायण राणे यांचे काम आहे. त्याशिवाय दुसरे त्यांना येत नाही, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. टीका केली नाही तर त्यांचे अस्तित्त्वच राहू शकत नाही, असे सांगत पाटील यांनी राणे यांना चिमटा काढला.

टॅग्स :Jalgaonजळगाव