शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या निर्णयाचा महावितरणला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:17 IST

जळगाव परिमंडळ : १ हजार कोटींच्या वीजबिल वसुलीचे महावितरणपुढे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाकाळात लाखो ग्राहकांनी ...

जळगाव परिमंडळ : १ हजार कोटींच्या वीजबिल वसुलीचे महावितरणपुढे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाकाळात लाखो ग्राहकांनी वीज बिल थकविल्यामुळे महावितरणतर्फे सर्वत्र जोरदार कारवाई मोहीम सुरू होती. मात्र, आता राज्यशासनानेच वीज बिल खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती दिल्यामुळे, महावितरणला या निर्णयाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे खान्देशात सद्य:स्थितीला विविध प्रकारच्या वीज ग्राहकांकडे महावितरणची तब्बल एक हजार कोटींच्या घरात थकबाकी असून, ही वसुली करण्यासाठी महावितरणसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कोरोना काळात महावितरणतर्फे शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी जाऊन रीडिंग न घेता नागरिकांना चार महिने सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, महावितरणने दिलेले सरासरी वीज बिल हे अवाजवी असल्याचे सांगत अनेक ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे महावितरण प्रशासनाने ग्राहकांच्या वीज बिलबाबत तक्रारी सोडविण्यासाठी तक्रार निवारण शिबिरेही घेतले. वीज बिलाबाबत नागरिकांच्या तक्रारीही दूर केल्या. मात्र, तरीदेखील खान्देशातील बहुतांश ग्राहकांनी वीज बिल न भरल्यामुळे खान्देशात तब्बल एक हजार कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. या मध्ये सर्वाधिक ६६० कोटींची थकबाकी जळगाव जिल्ह्यात असून, धुळे जिल्ह्यात ३७८ तर नंदुरबार जिल्ह्यात ३०१ कोटींची थकबाकी आहे. दरम्यान, महिनाभरापासून सुरू असलेल्या कारवाईमुळे यातील किती कोटींची वसुली झाली, याबाबत महावितरणतर्फे माहिती देण्यात आली नाही.

महावितरणच्या वसुली मोहिमेला उपमुख्यमंत्र्यांचा झटका

थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महावितरण प्रशासनाने गेल्या महिन्यापासून थकबाकीदार ग्राहकांविरोधात जोरदार कारवाई मोहीम हाती घेतली होती. थकबाकी भरण्याबाबत नोटिसा बजावूनही वीज बिल भरण्यात येत नसल्यामुळे फेब्रुवारी अखेर खान्देशात हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. महावितरणची ही मोहीम दिवसेंदिवस तीव्र होत असल्यामुळे या कारवाईला अनेक ठिकाणी विरोधदेखील झाला. तर काही ठिकाणी महावितरण विरोधात आंदोलन होत असल्यामुळे याचे पडसाद सद्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात महावितरणच्या वीजपुरवठा खंडित करण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे जाहीर केले. शासनाच्या या निर्णयामुळे महावितरणच्या वसुली मोहिमेला झटका बसला आहे.

शासनाने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे जाहीर केले आहे. वसुली मोहिमेला स्थगिती दिलेली नाही. महावितरण प्रशासन ग्राहकांना विनंती करून वसुली मोहीम सुरू ठेवणार आहे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण जळगाव परिमंडळ