शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

विद्यार्थी हितासाठी अभ्यासक्रमाचे धोरण शासनाने ठरवू नये - चेतन एरंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:12 IST

शासनाकडून शिक्षणाचा वापर समाजाचे मत तयार करण्यासाठी होतो

ठळक मुद्देशाळांमध्ये गरजा ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावेडोनेशनच्या खर्चातून मुलांना अनुभव मिळवून द्यावा

जळगाव : शासनाकडून शिक्षणाचा वापर केवळ समाजाचे मत तयार करण्यासाठी केला जात आहे. विद्यार्थी भविष्यात समाधानी राहील असे शिक्षण सध्या दिले जात नाही. त्यामुळे अभ्यासक्रम ठरविण्याचे धोरण हे शासनाने ठरवूच नये असे मत पुणे येथील ‘होमस्कुलींग’ची संकल्पना राबविणारे चेतन एरंडे यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमासाठी चेतन एरंडे हे नुकतेच शहरात आले होते. यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाध साधला असता, त्यांनी ते राबवत असलेल्या ‘होमस्कुलींग’मुळे मुलांची थांबणारी घुसमट व आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर असलेल्या अडचणी बाबत एरंडे यांनी माहिती दिली. एरंडे म्हणाले की, शासनाने शिक्षणव्यवस्थेत बदल न करता, केवळ शिक्षण चळवळीतील तज्ज्ञांना सोबत घेवून त्यांना निधी देण्याचे काम केले पाहिजे. शासनाने शिक्षण व्यवस्थेत ढवळाढवळ करु नये असेही एरंडे म्हणाले.कोण आहेत चेतन एरंडेचेतन एरंडे हे गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे ‘होमस्कुलींग’ ची संकल्पना राबवत आहेत. मुलांना शाळेत न पाठवता त्यांचा अभ्यास घरातच करून घेवून, मुलाची प्रचलित शिक्षणव्यवस्थेत होणारी घुसमट दुर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या उपक्रमाची सुरुवात स्वत:च्या मुलापासून केली आहे. त्यांच्या मते मुलाला हव्या त्या गतीने, कलाने व मर्जीने शिक्षण घेण्याची व माणूस म्हणून त्याला मिळालेल्या क्षमता ओळखण्याची व त्या क्षमता पूर्ण ताकदीने वापरण्याची संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्या उपक्रमात पुण्यातील २५० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचेही एरंडे यांनी सांगितले.शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गरजा ओळखून शिक्षण दिले जात नाही. ठराविक वेळेत निश्चित केलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील ठराविक वेळेतच शाळेत जाणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे व परीक्षा देणे हे निश्चित होत जाते. त्यामुळे विद्यार्थी तणावात येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या गजरा ओळखून शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत एरंडे यांनी व्यक्त केले.डोनेशनच्या खर्चातून मुलांना अनुभव मिळवून द्यावासध्याचे शिक्षण हे सर्वसामान्यांना न पेलण्यासारखेच आहे. लाखो रुपयांचे डोनेशन देत खासगी शाळांमध्ये विद्यार्थी घातले जात आहेत व त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे डोनेशनवर खर्च न करता त्यातून मुलांना नवीन अनुभव मिळावा यावर हा खर्च करावा. विद्यार्थ्यांना आवडणारे साहित्य, खेळावर हा खर्च करावा. तसेच ‘होमस्कुलींग’साठी पालकांनी देखील वेळ काढला पाहिंजे. घरीच अभ्यासक्रम पूर्ण करून ‘एन.आय.ओ.एस.’ या भारत सरकारच्या मुक्त शिक्षण विषयी सर्वाधिकार असलेल्या संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असेही एरंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव