शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी हितासाठी अभ्यासक्रमाचे धोरण शासनाने ठरवू नये - चेतन एरंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:12 IST

शासनाकडून शिक्षणाचा वापर समाजाचे मत तयार करण्यासाठी होतो

ठळक मुद्देशाळांमध्ये गरजा ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावेडोनेशनच्या खर्चातून मुलांना अनुभव मिळवून द्यावा

जळगाव : शासनाकडून शिक्षणाचा वापर केवळ समाजाचे मत तयार करण्यासाठी केला जात आहे. विद्यार्थी भविष्यात समाधानी राहील असे शिक्षण सध्या दिले जात नाही. त्यामुळे अभ्यासक्रम ठरविण्याचे धोरण हे शासनाने ठरवूच नये असे मत पुणे येथील ‘होमस्कुलींग’ची संकल्पना राबविणारे चेतन एरंडे यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमासाठी चेतन एरंडे हे नुकतेच शहरात आले होते. यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाध साधला असता, त्यांनी ते राबवत असलेल्या ‘होमस्कुलींग’मुळे मुलांची थांबणारी घुसमट व आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर असलेल्या अडचणी बाबत एरंडे यांनी माहिती दिली. एरंडे म्हणाले की, शासनाने शिक्षणव्यवस्थेत बदल न करता, केवळ शिक्षण चळवळीतील तज्ज्ञांना सोबत घेवून त्यांना निधी देण्याचे काम केले पाहिजे. शासनाने शिक्षण व्यवस्थेत ढवळाढवळ करु नये असेही एरंडे म्हणाले.कोण आहेत चेतन एरंडेचेतन एरंडे हे गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे ‘होमस्कुलींग’ ची संकल्पना राबवत आहेत. मुलांना शाळेत न पाठवता त्यांचा अभ्यास घरातच करून घेवून, मुलाची प्रचलित शिक्षणव्यवस्थेत होणारी घुसमट दुर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या उपक्रमाची सुरुवात स्वत:च्या मुलापासून केली आहे. त्यांच्या मते मुलाला हव्या त्या गतीने, कलाने व मर्जीने शिक्षण घेण्याची व माणूस म्हणून त्याला मिळालेल्या क्षमता ओळखण्याची व त्या क्षमता पूर्ण ताकदीने वापरण्याची संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्या उपक्रमात पुण्यातील २५० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचेही एरंडे यांनी सांगितले.शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गरजा ओळखून शिक्षण दिले जात नाही. ठराविक वेळेत निश्चित केलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील ठराविक वेळेतच शाळेत जाणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे व परीक्षा देणे हे निश्चित होत जाते. त्यामुळे विद्यार्थी तणावात येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या गजरा ओळखून शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत एरंडे यांनी व्यक्त केले.डोनेशनच्या खर्चातून मुलांना अनुभव मिळवून द्यावासध्याचे शिक्षण हे सर्वसामान्यांना न पेलण्यासारखेच आहे. लाखो रुपयांचे डोनेशन देत खासगी शाळांमध्ये विद्यार्थी घातले जात आहेत व त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे डोनेशनवर खर्च न करता त्यातून मुलांना नवीन अनुभव मिळावा यावर हा खर्च करावा. विद्यार्थ्यांना आवडणारे साहित्य, खेळावर हा खर्च करावा. तसेच ‘होमस्कुलींग’साठी पालकांनी देखील वेळ काढला पाहिंजे. घरीच अभ्यासक्रम पूर्ण करून ‘एन.आय.ओ.एस.’ या भारत सरकारच्या मुक्त शिक्षण विषयी सर्वाधिकार असलेल्या संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असेही एरंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव