शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

विद्यार्थी हितासाठी अभ्यासक्रमाचे धोरण शासनाने ठरवू नये - चेतन एरंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:12 IST

शासनाकडून शिक्षणाचा वापर समाजाचे मत तयार करण्यासाठी होतो

ठळक मुद्देशाळांमध्ये गरजा ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावेडोनेशनच्या खर्चातून मुलांना अनुभव मिळवून द्यावा

जळगाव : शासनाकडून शिक्षणाचा वापर केवळ समाजाचे मत तयार करण्यासाठी केला जात आहे. विद्यार्थी भविष्यात समाधानी राहील असे शिक्षण सध्या दिले जात नाही. त्यामुळे अभ्यासक्रम ठरविण्याचे धोरण हे शासनाने ठरवूच नये असे मत पुणे येथील ‘होमस्कुलींग’ची संकल्पना राबविणारे चेतन एरंडे यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमासाठी चेतन एरंडे हे नुकतेच शहरात आले होते. यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाध साधला असता, त्यांनी ते राबवत असलेल्या ‘होमस्कुलींग’मुळे मुलांची थांबणारी घुसमट व आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर असलेल्या अडचणी बाबत एरंडे यांनी माहिती दिली. एरंडे म्हणाले की, शासनाने शिक्षणव्यवस्थेत बदल न करता, केवळ शिक्षण चळवळीतील तज्ज्ञांना सोबत घेवून त्यांना निधी देण्याचे काम केले पाहिजे. शासनाने शिक्षण व्यवस्थेत ढवळाढवळ करु नये असेही एरंडे म्हणाले.कोण आहेत चेतन एरंडेचेतन एरंडे हे गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे ‘होमस्कुलींग’ ची संकल्पना राबवत आहेत. मुलांना शाळेत न पाठवता त्यांचा अभ्यास घरातच करून घेवून, मुलाची प्रचलित शिक्षणव्यवस्थेत होणारी घुसमट दुर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या उपक्रमाची सुरुवात स्वत:च्या मुलापासून केली आहे. त्यांच्या मते मुलाला हव्या त्या गतीने, कलाने व मर्जीने शिक्षण घेण्याची व माणूस म्हणून त्याला मिळालेल्या क्षमता ओळखण्याची व त्या क्षमता पूर्ण ताकदीने वापरण्याची संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्या उपक्रमात पुण्यातील २५० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचेही एरंडे यांनी सांगितले.शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गरजा ओळखून शिक्षण दिले जात नाही. ठराविक वेळेत निश्चित केलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील ठराविक वेळेतच शाळेत जाणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे व परीक्षा देणे हे निश्चित होत जाते. त्यामुळे विद्यार्थी तणावात येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या गजरा ओळखून शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत एरंडे यांनी व्यक्त केले.डोनेशनच्या खर्चातून मुलांना अनुभव मिळवून द्यावासध्याचे शिक्षण हे सर्वसामान्यांना न पेलण्यासारखेच आहे. लाखो रुपयांचे डोनेशन देत खासगी शाळांमध्ये विद्यार्थी घातले जात आहेत व त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे डोनेशनवर खर्च न करता त्यातून मुलांना नवीन अनुभव मिळावा यावर हा खर्च करावा. विद्यार्थ्यांना आवडणारे साहित्य, खेळावर हा खर्च करावा. तसेच ‘होमस्कुलींग’साठी पालकांनी देखील वेळ काढला पाहिंजे. घरीच अभ्यासक्रम पूर्ण करून ‘एन.आय.ओ.एस.’ या भारत सरकारच्या मुक्त शिक्षण विषयी सर्वाधिकार असलेल्या संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असेही एरंडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव