शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

भोवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 3:03 PM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत कौस्तुभ परांजपे...

दोरीला गुंडाळून भोवरा फिरवण्यात त्यावेळी वेगळी मजा वाटायची. भोवऱ्याभोवती गुंडाळलेली दोरी जेवढ्या जास्त जोरात ओढली जाईल तेवढा जास्त वेळ भोवरा फिरायचा. भोवरा फिरण्यालासुद्धा त्याला असलेली आर (टोकदार खिळा) कशी आहे, ती किती आत किंवा बाहेर आहे, तसेच त्याची जाडी किती आहे हेसुद्धा जबाबदार असते. तसाच तो कोणत्या प्रकारच्या पृष्ठ भागावर फिरतोय यावर त्याचे फिरणे अवलंबून असते. त्यामुळे तो जोरात फिरला तरी काही वेळा एका जागेवर स्थिर असतो, तर काही वेळा क्षणाक्षणाला जागा बदलतो. तसेच आपल्या स्वत:भोवती फिरताना काही वेळा ईतर गोष्टींभोवतीसुद्धा फिरतो असे लक्षात येते.सगळे भोवरा कसा फिरतो किंवा तो कसा फिरवावा हे सांगण्यासाठी नाही तर आपले आयुष्यसुद्धा या भोवºयासारखेच आहे हे जाणवले म्हणून लिहीत आहे.भोवरा फिरण्यासाठी जशी एका दोरीची गरज असते व ती दोरी भोवºयाभोवती गुंडाळावी लागते त्याशिवाय भोवरा फिरत नाही. तसेच माणसाचेही आहे. माणूस एक भोवरा आहे व तो दिवसभर आपल्याच समस्या सोडवायला फिरत असतो. रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र त्याचे त्या दिवसासाठीचे फिरणे थांबते.सकाळी उठल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी, समस्या याला तो तोंड देत असतो. अगदी आॅफिस, व्यवसाय या ठिकाणी निघणे, रहदारी, प्रवास साधने, पार्किंग समस्या, मुलांना शाळेत दाखल करण्यापासून त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत कसे शिकवावे याचा विचार, तरुण असेल तर नोकरी व व्यवसायाचा भेडसावणारा प्रश्न, थोडे स्थिरावले असतील तर कर्जाने घेतलेले घर, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रिज यासारख्या वस्तुंच्या हप्त्यांची पगाराशी किंवा उत्पन्नाशी घातलेली सांगड.परिवारात असलेले कार्यक्रम, आजारपण, ज्येष्ठांचा सांभाळ या करता करावी लागणारी धावपळ. सुट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे ठरविले असेल तर त्यासाठी केलेली आर्थिक तडजोड. याशिवाय बदलीची नोकरी असल्यास ठरावीक काळाने होणारी बदली त्यानंतर परत बसवलेली संसाराची घडी, याशिवाय कामाचे तास, त्या ठिकाणच्या अडचणी, त्रास, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केलेली धावपळ, अंतर्गत स्पर्धा यातही हल्ली नवरा बायको दोघेही काम करणारे असतात. त्यामुळे काही वेळा समस्यांमध्ये वाढ होत असते. या सर्व गोष्टी म्हणजे आपल्याभोवती असलेली व आपल्याला गुंडाळली जाणारी दोरी होय आणि ही दोरी ओढल्या गेल्यावर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माणूस भोवºयासारखा सतत आपल्याभोवती फिरत असतो. यातील काही समस्या रोज सुटतात तर रोज पुन्हा नव्याने निर्माण होतात, तर काही सुटण्यास बराच काळ लागतो. त्यातच माणसाचे दिवस, आठवडे, महिने, वर्षे संपत असतात. अशी अनेक वर्षे काढल्यावर जेव्हा तो स्थिरावल्यासारखा वाटतो तेव्हा माणूस नावाच्या भोवºयाची फिरण्याची गती कमी झालेली असते. नंतर तो फिरायचा थांबतो. पण असे थांबल्यानंतर त्याच्या लक्षात येते. या स्वत:सह परिवाराभोवती फिरण्यात त्याच्या आयुष्याची जवळपास ६० वर्षे संपत आलेली आहेत आणि आता तो समस्यांचा दोरीचा जोर कमी झाला म्हणून नाही तर थकलाय म्हणून थांबलाय...-कौस्तुभ परांजपे, जळगाव 

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव