शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

१२ दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अनियमित मान्सूनमुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. तब्बल बारा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अनियमित मान्सूनमुळे यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. तब्बल बारा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे, तसेच पावसाचा खंड मोठा राहण्याची शक्यता असून, जिल्ह्यात २० ऑगस्टनंतरच मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात जुलै महिन्यात करण्यात आलेली दुबार पेरणीची पिकेदेखील संकटात सापडली आहेत, तसेच सप्टेंबर व ऑगस्टअखेरमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरी या पावसामुळे शेतीला फायदा कमी नुकसानच होण्याची शक्यता राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झाला आहे. त्यात धरणगाव, अमळनेर व चोपडा या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ३० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील खरीप हंगाम जवळपास पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चोपडा, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता प्रशासनाकडे केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यातच झालेला पाऊस हा काही दिवसांपुरताच असून, पावसाचे खंड मोठे राहत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

२० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता नाहीच?

हवेचा दाब कमी होत असल्याने मान्सूनचे ढग तयार होत नसून, मान्सूनचा खंड वाढत आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यातील सर्वांत मोठा खंड आहे. २० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच असून, २० नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उडीद, मूग, सोयाबीनची वाढ खुंटली

जिल्ह्यात ३१ जुलैनंतर पावसाचा खंड सुरू झाला असून, शेतकऱ्यांचा नजरा आता आकाशाकडे केल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीन, उडीद, मुगाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे, तसेच आगामी काही दिवस पाऊस न झाल्यास उडीद व मुगामधील दाणे तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, तसेच बागायती कापसाची स्थिती चांगली असली तरी कोरडवाहू कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक पावसाचा खंड

यावर्षी जिल्ह्यात होणाऱ्या पावसात अनियमितता असून, पावसाचे खंड मोठे राहिले आहेत. जुलै महिन्यातदेखील पहिल्या आठवड्यात आठ दिवसांचा खंड होता, तर काही दिवस दोन ते तीन दिवसांचा खंड पडूनच पाऊस झाला. जून महिन्यातदेखील सुरुवातीला काही दिवस पाऊस झाल्यानंतर काही दिवसांचा ब्रेक घेऊनच पाऊस झाला, तर ऑगस्ट महिन्यात २०१५ नंतर पहिल्यांदाच पाऊस कमी झाला आहे. १ ते ९ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात केवळ २२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कोट..

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडला असून जून, जुलै व ऑगस्ट या तिन्ही महिन्यांमध्ये आधीच खंड राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. हीच स्थिती यंदाच्या मान्सूनमध्ये पाहावयास मिळत आहे. २० ऑगस्टपर्यंत मान्सूनचा खंड कायम राहण्याची शक्यता असून, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ

पावसाच्या ब्रेकमुळे खरीप हंगामातील जवजवळ सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. कापसाच्या उत्पादनावरदेखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सोयाबीनला मोठा फटका बसला असून, उडीद व मुगाची स्थितीदेखील काही वेगळी नाही.

-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक