शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी समाजनिर्मितीसाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस अभियानाची सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:26 IST

निरोगी समाजनिर्मिती स्वप्न साकार करण्यासाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस या अभियानाची सुरवात केली आहे. सदर अभियान हे जागतिक पातळीवर असून, महाराष्ट्रातून व मराठी माणसाकडून याची सुरवात होत आहे. याचा मला महाराष्ट्रीयन म्हणून रास्त अभिमान आहे, असे विचार महाराष्ट्र शासनाचे आरोग्यदूत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाचे आरोग्यदूत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांचे प्रतिपादनकेशवसूत ज्ञानप्रबोधिनीत व्याख्यानव्याख्यानमालेचे यंदा चौदावे वर्ष

भडगाव, जि.जळगाव : निरोगी समाजनिर्मिती स्वप्न साकार करण्यासाठीच मधुमेह मुक्ती व विनासायास वेटलॉस या अभियानाची सुरवात केली आहे. सदर अभियान हे जागतिक पातळीवर असून, महाराष्ट्रातून व मराठी माणसाकडून याची सुरवात होत आहे. याचा मला महाराष्ट्रीयन म्हणून रास्त अभिमान आहे, असे विचार महाराष्ट्र शासनाचे आरोग्यदूत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी येथील केशवसूत ज्ञानप्रबोधिनीच्या चौदाव्या वर्षाचे पहिले पुष्प गुंफताना व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील होते. व्यासपीठावर ग.स.बँकेचे चेअरमन विलास नेरकर, पोलीस निरीक्षक धनंजय वेरुळे, योगेश सोनजे इ. मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.निरोगी व सुदृढ राहण्यासाठी दोनच ठरावीक वेळेत ५५ मिनिटात भोजन घ्यावे. मधल्या काळात खाण्यासाठी तोंड बंद ठेवावे. इंग्रजांनी आपल्याला चहाचे व्यसन लावले आहे. त्याऐवजी ग्रीन टी, ब्लॅक टी, आरोग्यास उपयुक्त आहे. जेवण करताना काय काळजी घ्यावी, कोणते पदार्थ अगोदर खावे येथपासून तर आपण खात असलेल्या अन्नाचे कशाप्रकारे शरीरात विघटन होते व मधुमेहाला सुरवात कशापासून होते याबाबत आपल्या दीड तासाच्या व्याख्यानात डॉ.दीक्षित यांनी टीप्स दिल्या. तसेच लठ्ठपणा व मधुमेहापासून मुक्ती मिळवायाची असेल तर आपणास आपल्या आहार व विहारावर नियंत्रण ठेवावे. सुरवातीस या सवयी लागण्यासाठी आपणास त्रास होईल, परंतु नंतर आपण्यास त्याचा लाभ होईल, म्हणून आपली जीवनशैली बदलवून आपण आपले आरोग्य उत्तम आपणच राखू शकतो. यासाठी कोणतेही औषधोपचार होण्याची गरज नाही, असे आग्रही प्रतिपादन डॉ.दीक्षित यांनी केले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते केशवसूत व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रथम पुष्प आमदार किशोर पाटील यांनी आपल्या पिताश्री धनसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रायोजित केले होते. पुढील रौप्य महोत्सवी वर्षासाठी विनय जकातदार व डॉ.शांतीलाल तोतला यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. व्याख्यानास श्रोत्यांची प्रचंड उपस्थिती होती. प्रास्ताविक केशवसूत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विनयराव देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन सचिव प्रा.दीपक मराठे यांनी केले.

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव