शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी फळांची आवक, पण मंदगतीने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:27 IST

दरवाढ : अवकाळी पावसामुळे हंगाम लांबल्याचा परिणाम, आवळ्याचे मोठे नुकसान

जळगाव : हिवाळा सुरु झाल्यानंतर आता बाजारपेठेत हळूहळू अनेक फळांनी कब्जा मिळवला आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा फळेही १५ ते २० दिवस उशिराने बाजारात दाखल झाली आहेत. पावसाने यंदा फळांची आवकही काहीशी मंदावली असून दरही १० ते ३० रुपयांनी वाढले आहेत.यंदा दिवाळीच्या मोसमातही तुफानी पाऊस झाल्याने हिवाळा काही दिवस लांबला तर पावसामुळे फळपिकांचे नुकसान झाले. तसेच हिवाळी फळांचा हंगामही लांबला आहे. पावसामुळे फळांची आवक मंदावली आहे. साधारणपणे हिवाळ्यात आवळ्याची जास्त प्रमाणात खरेदी होते. हा आवळा ज्यूस, आवळासुपारी वा कंटी बनवण्यासाठी जास्त करून वापरला जातो. यंदा आवळ्याची आवक काही प्रमाणात मंदावली आहे. दोन दिवसांपूर्वी ५० रुपये किलो असलेला आवळा मंगळवारी ४० रुपये किलो या दराने विकला जात होता. गेल्यावर्षी आवळ्याची ३० रुपये किलो दराने विक्री होत होती. जळगावात आलेला हा आवळा इंदोरवरून दाखल झाला असून या भागातही पावसामुळे आवळा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा दरात प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.नागपूरहून येणाऱ्या संत्र्यांनीही भाव खाल्ला आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट दराने सध्या संत्र्यांची विक्री सुुरु आहे. गेल्यावर्षी ४० रुपये किलो या दराने विकली जाणारी संत्री यंदा मात्र ८० रुपयांपर्यंत पोहोचली आहेत.यंदा गुजरातची बोरे स्थानिक जातीच्या बोरांपेक्षा लवकर दाखल झाली आहेत. गुजरातहून येणाºया चमेली बोरांचा सध्याचा दर हा ६० रुपये किलो असा आहे तर स्थानिक शेतकऱ्यांकडून बाजारपेठेत बोरांची आवक वाढल्यानंतर हा दर कमी होईल, असा अंदाज व्यापाºयांनी व्यक्त केला आहे.सीताफळे ८० रुपये तर पेरू ५० ते ६० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. गेल्यावर्षी पेरू आणि सीताफळ यांचा दर हा ३० ते ४० रुपये किलो होता. यंदा या दरात चक्क दुपटीने वाढ झाली आहे. पावसामुळे ही दोन्ही फळे उशिराने दाखल झाली आहेतच; शिवाय आवकही कमी झाल्याने या दोन्ही फळांचे दर कमी होतील, असे सध्यातरी चित्र नाही, असे काही फळ विक्रेत्यांनी सांगितले. हंगाम लांबल्याचा फळविके्रत्यांना फटका बसल्याचे चित्र आहे़स्थानिक बोरांची आवक वाढल्यास दर कमी होणार.जळगावच्या बाजारपेठेत अजूनही चमेली बोरांचीच आवक आहे. जळगाव, मेहरूण येथील बोरांची आवक अजूनही झालेली नाही. नंदूरबारकडून येणाºया अ‍ॅपल बोरांचीही प्रतिक्षाच आहे. ही बोरे पुढील दहा दिवसात दाखल होतील, असा व्यापाºयांचा अंदाज आहे. ही बोरे बाजारपेठेत आल्यानंतर दर कमी होतील, असे व्यापाºयांनी सांगितले.मटारचीही आवकजबलपूर येथून मटारचीही (वाटाणे) आवक झाली असून गेल्या आठवड्यात मटारचे दर १०० ते १२० रुपये होते. मात्र आवक वाढल्याने आता हेच दर ८० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.सीताफळांचा हंगाम समाप्तीच्या मार्गावरसीताफळांचा हंगाम आणखी ४ ते ५ दिवसच राहील, असे काही व्यापाºयांनी सांगितले. सीताफळांचा हंगाम हा नवरात्रोत्सव ते दिपावलीदरम्यान सुरु होतो. यंदा हा हंगामही १५ दिवस लांबला. मात्र आता हा हंगाम समाप्तीच्या मार्गावर आहे, असे व्यापाºयांनी सांगितले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव