शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे तलावात पाच वर्षांनंतर साचले पाणी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 16:34 IST

गेल्या सहा वर्षांपासून कोरडा पडलेल्या हरताळे तलावात यंदा पाणी साठायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देहरताळेकर सुखावले२० ते २५ टक्के जलसाठा नागरिकांना तूर्त दिलासाशेवटी वरूणराज्याचीच कृपा

चंद्रमणी इंगळेहरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : गेल्या सहा वर्षांपासून कोरडा पडलेल्या हरताळे तलावात यंदा पाणी साठायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात झालेल्या कमी पावसामुळे यंदाही तलाव भरेल किंवा नाही याची चिंता वाटत होती. परंतु निसर्गाची किमयाच न्यारी. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीचा प्रत्यय येथे सर्वांनाच आला. आॅगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील पावसामुळे हरताळे तलावाची तहान भागवायला सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षात कधी नव्हे एवढी हरताळेवासीयांना व सर्व पशुपक्ष्यांसह प्राण्यांना पाणीटंचाईचा मोठ सामना करावा लागला आहे.कमी पावसामुळे हा तलाव भरतच नव्हता. त्याचे वरील स्रोत भरल्याने यंदा निसर्गाची सर्वांवरच कृपा झाली आहे. आॅगस्टपर्यंत पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होती. परिसरातील सर्वच पाझर तलाव कोरडेठाक होते. मात्र १५ आॅगस्ट व सप्टेंबरच्या पावसामुळे लहान तलाव जलसाठा पूर्ण झाल्याने हरताळे तलावाचे पाणी साठायला मदत झाली आहे.एकेकाळी शेतीसाठी वरदान असलेला १७५ हेक्टर २५ आर. क्षेत्रावरील तलाव आता निसर्गाच्या पाण्यानेच भरायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हरताळेकरही सुखावले आहे. तसेच विहिरींच्या पातळीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा पावसाळा समाधानकारक असला तरी केळी, ऊस, फळबाग आदी व्यापारी पिकांपासून शेतकरी कोसोदूर आहे. आता जरी विहिरीला पाणी असले तरी केळी लागवड हातची गेल्याने केळी लागवडीवर परिणाम झालेला दिसत आहे.पुरातन तलावाचे संगोपन व जतन होणे गरजेचे असताना या तलावाकडे जि.प.ने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे आरोप नागरिकांत बोलले जात आहे. सध्या तलाव हळू हळू शेवटच्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असली तरी तलावातील काटेरी झुडपांमुळे नाराजी व्यक्त होत आहे. काही भागात तर काटेरी झुडपे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे विद्रुपीकरण कायम आहे.सरत्या पावसाळी ऋतूतील निसर्गाच्या कृपेने हरताळे तलावाची व पर्यायाने संपूर्ण परिसरातील लहान तलावाची तहान तूर्तास भागवली आहे.गेल्या पाच-सहा वर्षापासून तलाव काही अंशी का होईना पाण्याने भरला भरत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.२०१३ मध्ये हा तलाव ओव्हर फ्लो झाला होता. त्यानंतर सलग दर वर्षी कमी पावसामुळे तलाव भरत नव्हता. आता पाच वर्षांनंतर जलसाठा दिसत असल्याने डोळ्यांचे पारणे फिटले आहे.तलाव कोरडा पडल्याच्या काळात हजारो डंपर, ट्रॅक्टरने हा गाळ शेतीसाठी व धरणासाठी उपयुक्त ठरला.तलावाच्या दक्षिणेकडील भागातील गाळ काढल्याने जलसाठा होण्यास मदत झाली आहे.तलावात हळूहळू जलसाठ्यात वाढ होत असल्याने मासेमारीला सुगीचे दिवस येण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यासाठी मत्स्यबीज सोडणे गरजेचे आहे.तलावात जलसाठा होत असल्याने या परिसरात शेकडो प्रकारच्या पक्ष्यांचा विहार सुरू झाला आहे. विविध जातींचे पक्षी निसर्गप्रेमी व पक्षीमित्रांना पाण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने प्राण्यांचे विहरणे या वेळेत अनुभवता येणार आहे. पाणीसाठा होत असल्याने पर्यटकांना व पक्षीप्रेमींना निसर्गरम्य ठिकाणाचा मनमोहक आनंद आता घेता येणार आहे. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.असे असले तरी ओझरखेडा तलावाचा ओव्हर फ्लो व आबदगाव तलावाचा पूर्णा नदीवरील पाईपलाईनने जाणारा पाण्याचा स्रोत या तलावात सोडण्याची भविष्यातील कायमस्वरूपी तलावात पाणी राहण्यासाठी नितांत गरज आहे. नैसर्गिक पाण्यामुळेच हा तलाव भरत असल्याने त्यावर विसंबून असलेला शेती व्यवसाय ,मासेमारी व्यवसाय, पर्यटन विकास, पशुधनाची गैरसोय दूर झाली पाहिजे यासाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत तलाव संवर्धन व विकास योजनांचा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी गतवैभव प्राप्त करून देणे व त्याचे नियोजन करणे आतापासूनच महत्त्वाचे आहे. आता तलावाचे पाणी कमी होऊ नये म्हणून आतापासूनच यात पाणी सोडण्यासाठी नियोजनाची गरज असल्याचे जाणकार व शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

 

टॅग्स :RainपाऊसMuktainagarमुक्ताईनगर