शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

अबब.... काय ही महागाई, कोरोनानंतर दीडपटीने वाढले किचनचे ‘बजेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे कोरोनाने वैद्यकीय, स्वच्छता यावरील खर्च वाढण्यासह उत्पन्नात कपात झाली असताना महागाई दररोज उच्चांकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे कोरोनाने वैद्यकीय, स्वच्छता यावरील खर्च वाढण्यासह उत्पन्नात कपात झाली असताना महागाई दररोज उच्चांकी गाठत असून, सामान्यांना जगणे कठीण होत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरला त्या मार्च २०२० पासून ते आजपर्यंतचा महागाईचा चढता आलेख पाहिला तर दीडपटीने केवळ खाण्या-पिण्याचा खर्च वाढला आहे. वैद्यकीय उपचार, वीज बिल या खर्चाचा विचार केला तर कोठेच ताळमेळ बसताना दिसत नसून, बचत तर आता केवळ स्वप्नच राहू पाहत आहे.

मागणी व पुरवठ्यावर बाजारपेठेचे गणित अवलंबून असते. पुरवठा कमी झाला व मागणी वाढल्यास भाववाढ होणे स्वाभाविक असते. कोरोना काळापासून लॉकडाऊनच्या भीतीने मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागल्याने भाववाढ झाली ती नंतर मात्र काही कमी झाली नाही. सध्याच्या भाववाढीला या सोबतच सर्वांत महत्त्वाचे कारण ठरत आहे ते म्हणजे इंधन दरवाढ.

खाद्यतेलात कधी नव्हे एवढी वाढ

घर असो अथवा हॉटेल, या प्रत्येक ठिकाणी दररोज हमखास लागणारा घटक म्हणजे खाद्यतेल. महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला सर्वाधिक खर्च करावा लागत आहे तो एकट्या खाद्यतेलावर. त्यात यामध्येच कधी नव्हे एवढी मोठी वाढ दीड वर्षात झाली आहे. खाद्यतेलामध्ये सर्वाधिक वापर होतो तो सोयाबीन तेलाचा. या तेलाचे भाव कमी-जास्त झाले तरी ते ५ ते १० रुपयांच्या मर्यादेत असायचे. त्यामुळे हे तेल गेल्या काही वर्षांत ७५ ते ९५ रुपये प्रतिकिलोदरम्यान राहिले. मात्र, कोरोना सुरू झाल्यापासून मार्च २०२० ते सप्टेंबर २०२१ या दीड वर्षाच्या काळात या तेलाच्या भावात ६० रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन ते थेट १५५ रुपयांपर्यंत पोहोचले. तीन वर्षांत २० रुपयांपर्यंतची वाढ असणाऱ्या या तेलाच्या भावात पूर्वीच्या वाढीच्या निम्म्या काळात तीनपटीने वाढ झाली, हे विशेष. शेंगदाणा तेलाचाही विचार केला तर या तेलातही ६० रुपये प्रतिकिलोने दीड वर्षात वाढ होऊन ते १९५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. खाद्यतेलातील ही भाववाढ सर्वांनाच चक्रावणारी आहे.