ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने सामरोद येथे शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 22:16 IST2023-04-14T22:16:03+5:302023-04-14T22:16:21+5:30
देसाई हे आपल्या शेतातून घराकडे ट्रॅक्टरने कडबा नेत होते. ते स्वत: ट्रॅक्टर चालवित होते. वाटेतच त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत पडले. त्याखाली दबून देसाई यांचा मृत्यू झाला.

ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने सामरोद येथे शेतकऱ्याचा मृत्यू
जामनेर : शेतातून घराकडे कडबाकुट्टी घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉलीसह बांधावरील विहिरीत पडले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना जामनेर तालुक्याती सामरोद शिवारात शुक्रवारी दुपारी घडली. सुपडू सुकदेव देसाई (६५, रा. सामरोद, ता. जामनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
देसाई हे आपल्या शेतातून घराकडे ट्रॅक्टरने कडबा नेत होते. ते स्वत: ट्रॅक्टर चालवित होते. वाटेतच त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत पडले. त्याखाली दबून देसाई यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच सरपंच श्रीकांत पाटील व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने आधी ट्रॉली, हुड काढण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. हर्षल चांदा यांनी दिलेल्या माहितीवरून जामनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.