शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

हवेच्या शुद्धीकरणाचा ७६ लाखांचा निधी मनपाकडे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST

जळगाव : देशभरातील १३८ शहरांची हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. त्यात जळगावचा समावेश आहे. ही गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ...

जळगाव : देशभरातील १३८ शहरांची हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. त्यात जळगावचा समावेश आहे. ही गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेला दोन वर्षांचा निधी हा अखर्चित आहे. २०१९ -२० मध्ये दहा लाख रुपये मिळाले होते. त्यापैकी काही निधी हा खर्च झाला. २०२०-२१ मध्ये ७६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता हा संपूर्ण निधी पडून असल्याचा आरोप जळगाव फर्स्टचे डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केला आहे.

शनिवारी सायंकाळी डॉ.राधेश्याम चौधरी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. चौधरी यांनी सांगितले की, २०१९-२० चा निधी मिळाला होता. त्यातून मनपात काही व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित निधी शिल्लक आहे. २०-२१चा ७६ लाखांचा निधीदेखील खर्च करण्यात आलेला नाही. याबाबत निरी (राष्ट्रीय प्रदूषण अभियांत्रिकी अनुसंधान) ने याबाबत सुक्ष्म नियोजन केले होते. त्याचा आराखडा मनपाला पाठविला होता. मात्र, त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता खूप ढासळली आहे. धुळीचे लोट उठतात. त्यामुळे अनेकांना श्वसनाचे विकार जडत आहे. मात्र, मनपाने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आलेला निधी खर्चच केला नाही. हा खर्च न केल्याने पुढील पाच वर्षांपर्यंतचा निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. कारण ही कामे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घ्यायचे आहे. मात्र, या निधीबाबत आयुक्तांनाच माहिती नव्हती. त्यांनी संबंधित अभियंत्याला विचारणा केल्यानंतर त्याने निधी शिल्लक असल्याचे सांगितले असल्याचेदेखील डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, २०२१ मध्ये निधी परत गेल्याचा परिणाम हा पुढील पाच वर्षे होणार आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार. या दिरंगाईबद्दल मनपा प्रशासन आणि सत्ताधारी कुणावर जबाबदारी निश्चित करणार, असा प्रश्नदेखील डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केला.