शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण? दरवर्षी केवळ नोटिसांचा फार्स; कारवाई मात्र नाहीच लोकमत न्यूज नेटवर्क ...

१०८ धोकादायक इमारतीत ६०० रहिवासी; मरणाची हौस नाही; पण?

दरवर्षी केवळ नोटिसांचा फार्स; कारवाई मात्र नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मनपा प्रशासनाकडून धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित इमारत मालकाला नोटीस बजावण्यात येते. मात्र त्यापलीकडे महापालिका प्रशासनाकडून इतर कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. शहरात एकूण १०८ धोकेदायक इमारती असून, यामध्ये तब्बल ६००हून अधिक नागरिक राहत आहेत. पावसाळ्यात दुर्दैवाने काही घटना घडल्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

या इमारतींमध्ये राहण्याची इच्छा येथील रहिवाशांची नसली तरी पर्याय नसल्याने या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याची खंत या इमारतीमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊनच या ठिकाणी एक-एक रात्र काढावी लागते. मरण्याची हौस नसली तरी पर्याय नसल्यामुळे याठिकाणी दिवस काढावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मनपाकडून दरवर्षी नोटिसांचा सोपस्कार पार पाडला जातो, घरमालकांना इशारे दिले जातात, मात्र कारवाई कोणतीही होत नाही. घरमालक इमारतींची दुरुस्तीदेखील करत नाहीत अन् मनपा प्रशासनाकडून त्या घरमालकांवर कोणतीही कारवाईदेखील केली जात नाही. या परिस्थितीमुळे मात्र या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा पावसाळ्यातील प्रत्येक रात्र जीव मुठीत घेऊन काढावी लागत असते. जळगाव शहरात इमारत कोसळल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सारे कळते मात्र कुठे जाणार?

आम्ही राहत असलेली इमारत धोकेदायक असली तरी इतर कोणताही पर्याय आमच्याकडे नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर किरकोळ दुरुस्ती करून या इमारतींमध्ये दिवस काढावे लागत आहे.

- रघुनाथ सोनवणे, रहिवासी

इमारत धोकेदायक असल्याने या ठिकाणी पावसाळ्यातील कमीत कमी दिवस राहण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच दरवर्षी किरकोळ दुरुस्ती करून, पावसाळ्याच्या हंगाम संपण्याची वाट पाहत असतो.

-कमलबाई माळी, रहिवासी

जळगाव शहरात घरभाडे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. महागाईच्या काळात मिळेल त्या घरात काही काळ वास्तव्य करावे लागले तरी, ते काढण्याचे प्रयत्न असतात. इमारत कोसळण्याची भीती तर असतेच, मात्र पर्याय तरी आमच्याकडे काय आहेत.

- लादू सुरवाडे, रहिवासी

वारंवार दिल्या नोटिसा

पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी सर्वेक्षण करून संबंधित इमारत मालकांना नोटिसा दिल्या जातात. त्यांना घर सोडण्याची किंवा घराची दुरुस्ती करण्यासंदर्भात सांगितले जात असते. मात्र दरवर्षी अनेक घरमालक इमारतीची किरकोळ दुरुस्ती करून वेळ मारून नेतात, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात एकूण १०८ धोकेदायक इमारती आहेत.

इमारत पडल्यास जबाबदार कोण?

शहरातील धोकेदायक इमारतींमध्ये बहुतांश रहिवासी हे भाडेधारक आहेत. मनपा प्रशासनाकडून या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची जबाबदारी पार पाडली जाते तर इमारत मालकदेखील किरकोळ दुरुस्ती करून, याकडे दुर्लक्ष करत असतात. पावसाळ्यात शहरातील एखादी इमारत कोसळून त्यामध्ये जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. मनपा प्रशासनाने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, अत्यंत धोकादायक इमारती या तोडण्याची गरज आहे.