शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

55 हजार स्वस्त धान्य दुकानदार 1 ऑगस्टपासून संपावर

By admin | Updated: July 2, 2017 17:52 IST

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय : एकही दुकानदार माल उचलणार नाही

ऑनलाईन लोकमतजळगाव,दि.2 - सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना शासनात समावेश करून घेण्याचा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. मात्र शासनाकडून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली  केली जात आहे. या मागणीकरीता राज्यातील 55 हजार स्वस्त धान्य दुकानदार 1 ऑगस्टपासून संपावर जाणार असल्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला रविवारी घेतला. रविवारी जळगाव शहरातील पत्रकार भवनात ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स व राज्य रेशन संघटनेच्या पदाधिका:याची राज्यस्तरीय बैठक झाली.  यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर, बाबुराव म्हमाणे , जमनादास भाटीया, विजय गुप्ता, गणपत डोळसे-पाटील, ए.के.खान, संजय देशमुख, जगन्नाथ धोटे, अण्णाजी शेटे, देवीदास देसाई, शहाजी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.  यांच्यासह राज्यभरातून आलेले संघटनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने  उपस्थित होते.  पैशांसाठी नाही, जगण्यासाठी लढा पुकारायावेळी बोलताना गजानन बाबर म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांकडून जो  संप पुकारण्यात येत आहे. तो संप हा कुठल्याही सरकार विरोधात नसून, तो दुकानदारांच्या हक्कासाठीचा लढा आहे. आता पैशांसाठी नाही तर जगण्यासाठी लढा पुकारा असे आवाहन बाबर यांनी केले. 1 ऑगस्टपासून राज्यभरातील दुकानदार संप करणार असून संप काळात एक ही दुकानदार माल उचलणार नाही असा ठराव राज्यस्तरीय बैठकीत अध्यक्ष गजानन बाबर यांनी जाहीर केला. हा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे. सामूहिक आत्मदहनाचा इशारासंघटनेचे उपाध्यक्ष जमनादास भाटीया यांनी सांगितले की, संपाच्या काळात सर्व  दुकानदारांनी एकोपा दाखविण्याची गरज आहे.  जोर्पयत मागणी पूर्ण होणार नाहीत. तोर्पयत संप कायम ठेवण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील भाटीया यांनी दिला.